Editor

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अंमलात आणाव्यात महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीच्या पायाभरणीसाठी कार्यवाहीचे निर्देश

राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व …

Read More »

उद्धव ठाकरे- राज ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकारणाची समिकरणे बदलणार ? आज उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर

राज्यातील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या राजकीय …

Read More »

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची २१ नेत्यांची टीम शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती पुढीलप्रमाणे असेल. आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात …

Read More »

अजित पवार यांची माहिती, नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणणार नेपाळमधील राजकिय अस्थिर परिस्थितीवर केले भाष्य

नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला …

Read More »

नेपाळच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, आमच्या संविधानाचा अभिमान राष्ट्रपतींना विधेयकासंदर्भात कालमर्यादा देता येते का प्रकरणी सुनावणीवेळी दिला संदर्भ

भारतीय संविधानाची ताकद अधोरेखित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नेपाळ हिंसाचाराचा संदर्भ दिला. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने राष्ट्रपती संदर्भ प्रकरणाची सुनावणी सुरू असताना नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “आम्हाला आमच्या संविधानाचा अभिमान आहे, शेजारील …

Read More »

बिहारनंतर आता संपूर्ण देशभरात निवडणूक आयोग राबविणार एसआयआर ऑक्टोंबर महिन्यापासून राबविण्यात येणार असल्याची शक्यता

निवडणूक आयोगातील सूत्रांच्या हवाल्यानुसार, ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीची विशेष देशभरात पुनरावृत्ती सुरू होण्याची अपेक्षा आहे. बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) बैठकीत या प्रक्रियेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली, जिथे या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. निवडणूक आयोगाने अलीकडेच राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये अशाच प्रकारची मतदार यादी पुनरावृत्ती केली. …

Read More »

नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव बालेन शाह यांच्याशी संपर्क करूनही संपर्क स्थापित नाही

देशाच्या पुढील पंतप्रधान पदावर चर्चा करण्यासाठी ५,००० हून अधिक तरुणांनी व्हर्च्युअल बैठकीत भाग घेतल्यानंतर नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की या जनरल झेड यांच्या प्रमुख पसंती म्हणून उदयास आल्या आहेत. ऑनलाइन चर्चेत सर्वोच्च पदासाठी संभाव्य उमेदवारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना सुरुवातीला आवडते मानले जात होते, …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा निर्धार, ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्याचा निर्णय

भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश …

Read More »

मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलम म्हणाले की, भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत बिझनेस कॉन्क्लेव

मॉरिशस हा भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार असून येथे मोठ्या व्यावसायिक संधी आहेत. भारत-मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन करुन भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल, असा विश्वास मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलम यांनी व्यक्त केला. मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांच्या दोन दिवसीय मुंबई भेटीदरम्यान हॉटेल ट्रायडेंट येथे बिझनेस कॉन्क्लेव्हचे …

Read More »

आमदार रईस शेख यांचा आरोप, भिवंडीत बेकायदा गोदामांच्या संख्येत बेसुमार वाढ एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा स्थानिक महानगरपालिकेकडून प्रकल्पांना मंजुरी मिळावी, आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र

आशियातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक्स हबपैकी एक असलेल्या भिवंडी येथील औद्योगिक गोदाम प्रकल्पांना मंजुरी आणि रेरा नोंदणीची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत विकासाचे सुलभीकरण आणि लघु व मध्यम गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी गोदाम प्रकल्पांना नियम अत्यावश्यक असल्याचा दावाही यावेळी केला. …

Read More »