Editor

मतदार पुर्ननिरिक्षणात बिहार मधील ५२ लाख नावे निवडणूक आयोगाने वगळली ५२ पैकी १८ लाख मतदार मृत असल्याचा आयोगाचा दावा

निवडणूक आयोगाने मंगळवारी सांगितले की, चालू सुधारणा प्रक्रियेचा भाग म्हणून बिहारमधील मतदार यादीतून ५२ लाख नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काढून टाकण्यात आलेल्या नावांमध्ये मृतांची नोंद असलेले १८ लाख मतदार, इतर मतदारसंघांमध्ये स्थलांतरित झालेले २६ लाख आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असलेले ७ लाख मतदार यांचा …

Read More »

डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यापासून रोखल्याने एका अमराठी व्यक्तीची मराठी महिलेला मारहाण रिसेप्निस्ट म्हणून महिला क्लिनिकमध्ये काम करत होती

ठाणेतील कल्याण मध्ये एका खाजगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या २६ वर्षीय महिलेला डॉक्टरांच्या चेंबरमध्ये अपॉइंटमेंटशिवाय प्रवेश नाकारल्याने एका पुरूषाने तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आविनाश जाधव यांनी मुलीचा बदला घेणार असल्याचे सांगत संबधित अमराठी व्यक्तीचा शोध पोलिसांनी घ्यावा अन्यथा मनसैनिक आपल्या पद्धतीने शोध …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार गडचिरोलीची 'स्टील हब'च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल

गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांच्या जीवनमानात बदल घडून गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे. जल, जंगल, जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम असणार आहे. पुढील काही वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ …

Read More »

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्या नेमके कारण काय? आरोग्य की अन्य न्यायमूर्ती यशवंत वर्मा, ऑपेरेशन सिंदूर आणि निवडणूक आयोगाचे बिहारमधील निवडणूकीसंदर्भातील कृती

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. अपेक्षेप्रमाणे वादळी, विरोधी पक्ष सरकारवर हल्ला करत होते. तथापि, दुसरीकडे कुठेतरी अनपेक्षित वादळ निर्माण होत होते, असे विरोधी पक्ष नेत्यांचे वक्तव्य आणि दिवसातील घडामोडी उघड करा. यावरून असे दिसून येते की उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अनपेक्षित वादळाच्या समोर होते आणि त्यांनी …

Read More »

एअर इंडियाच्या विमानाला आग विमानाच्या सहायक पॉवर युनिटला आग लागली

हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय ३१५ विमानाच्या सहाय्यक पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागल्याने त्याच्या मागील भागात आग लागली. मंगळवारी (२२ जुलै २०२५) दुपारी एअरबस ए३२१ विमान गेटवर उतरवून पार्क केल्यानंतर ही घटना घडली. एअर इंडियाच्या या विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. “२२ जुलै २०२५ रोजी …

Read More »

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?

महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …

Read More »

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खुलासा, रूपया शेतकरी देत, मग भिकारी कोण… मी कोर्टात खेचणार शेतकऱ्यांकडून सरकार रूपया घेतं मग भिकारी कोणं

दोन दिवसांखाली लातूरमध्ये महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद होती. परंतु त्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओचा निषेध छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे राजकिय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिनाचे …

Read More »

एसबीआयच्या दफ्तरी रिलायन्स कम्युनिकेशनचे अनिल अंबानी फ्रॉड अनिल अंबानी यांच्या विरोधात सीबीआयमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची संसदेत माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि प्रमोटर संचालक अनिल डी. अंबानी यांना ‘फ्रॉड’ म्हणून वर्गीकृत केले आहे आणि सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सोमवारी संसदेत सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या फसवणूक जोखीम व्यवस्थापनावरील मास्टर निर्देश आणि बँकेच्या बोर्ड-मंजूर फ्रॉड-फसवणुकीच्या वर्गीकरण, अहवाल आणि व्यवस्थापन धोरणानुसार १३ जून २०२५ …

Read More »