राज्यात इथेनॉलशी संबंधित तांदूळ घोटाळ्याचे वृत्त समोर आल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी आरोप केला की, भाजपाच्या राजवटीत मध्य प्रदेश “भ्रष्टाचार आणि लुटीचे केंद्र” बनले आहे. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विषयावरील मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आरोप केला की, भाजपाच्या राजवटीत सार्वजनिक जीवनातील उत्तरदायित्वाला …
Read More »मान्सून कमकुवतः पाऊस गायब होणार की, पुन्हा बरसणार? हिंदी महासागरातील बाष्पयुक्त वारे आणि मान्सून ट्रफच्या कमी दाब्याच्या पट्यावर अवलंबून
मान्सूनच्या ऐन हंगामात भारताचा मोठा भागात मान्सून बरसला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तो असामान्यपणे शांत झाला असल्याचे दिसून येत आहे. शनिवार, ११ जुलै रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाचा जवळपास ७०-८०% भाग ढगाळ नसलेला किंवा अगदी कमी ढगाळ असल्याचे दिसून आले, तसेच काही प्रदेशांमध्ये कमी किंवा अजिबात पाऊस पडला नसल्याचेही दिसून …
Read More »व्हिएतनाममध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू 'हॉन मे रुट न्गोई' पासून सुमारे ४०० मीटर अंतरावर बोट उलटली
व्हिएतनामच्या फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ ३२ भारतीय प्रवासी आणि चार कर्मचारी असलेली स्पीडबोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती व्हिएतनामी अधिकाऱ्यांनी दिली. फु क्वोक विशेष आर्थिक क्षेत्रातील (Special Economic Zone) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओशन पर्ल आयलंड कंपनी’ची ही स्पीडबोट पर्यटकांना ‘हॉन मे रुट’ (Hon May Rut) …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एमपीएससीची ऑनलाईन परिक्षा पद्धत तातडीने रद्द करा नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा
मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता, परंतु आपल्याकडील एमपीएससी (MPSC) नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा आहे. एमपीएससीची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून तातडीने ऑनलाईन परीक्षा व Normalization रद्द करावे, अन्यथा राज्यभर आंदोलन …
Read More »देशातील सर्वात मोठे ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीचा लाभ
अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीतून असंख्य रूग्णांना आपल्या व्याधीपासून मुक्त होण्यास मदत झाली आहे. तेवीस-चोवीस वर्षांपूर्वी मी स्वतः पाठदुखीने त्रस्त असताना या उपचार पद्धतीने मला तंदुरुस्त होता आले. या ज्ञानशाखेच्या विस्तारासाठी व याचे शैक्षणिक मार्ग वृद्धींगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून शासकीय पातळीवर कोठेही कमतरता पडणार नाही, अशी निःसंदिग्ध ग्वाही …
Read More »राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती
महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. ‘फॉर्च्युन इंडिया’ …
Read More »कन्हैया कुमार यांची मागणी, देणगी चोरीची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा, ट्रस्ट बरखास्त करा प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही
भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ ही ऐतिहासिक योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये ५० …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये
विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी विधेयकातील अनेक तरतुदींवर गंभीर आक्षेप नोंदवत हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रभू रामचंद्रांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आहे. त्यामुळे रामटेकसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक …
Read More »
Marathi e-Batmya