बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपटास मान्यता प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची दिली माहिती
कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे …
Read More »आशिष जयस्वाल यांची माहिती, पारंपरिक पुजाऱ्यांसाठी राज्यस्तरीय सर्वसमावेशक धोरण लवकरच पुजाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी शासनाचे सकारात्मक पाऊल
राज्यातील विविध देवस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या सेवा देणाऱ्या पारंपरिक पुजारी समाजाच्या हक्क व संरक्षणासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या सन्मान व उपजीविकेची हमी देणारे सर्वसमावेशक राज्यस्तरीय धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धर्मादाय आयुक्त एस. एस. कलोती, विधी व न्याय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर करण्यासाठी अंमलबजावणीवर भर द्यावा ‘विकसित महाराष्ट्र 2047’ला वेग
राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत २०३० पर्यंत मोजता …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, राज्यात ‘हब आणि स्पोक मॉडेल’ द्वारे अवयवदान व प्रत्यारोपण चळवळ व्यापक करा 'हब अँड स्पोक मॉडेल' चळवळ गतीमान करावा
महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भाईदर व मुंबई येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात अवयव प्रत्यारोपण उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, नरेंद्र मोदींचा ना खाऊंगा, ना खाने दुंगाचा नारा पोकळ देशात १२ वर्षापासून मोदींच्या सहभागानेच देशाची लूट सुरु
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. वर्षाला २ कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, १०० स्मार्ट सीटी बनवणार, विकास करणार अशा घोषणा दिल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, अशी राणाभीमदेवी थाटात गर्जना केली पण मोदी फुसका बार निघाले. १२ वर्षापासून देशात अक्षरशः लुट सुरु आहे, दोन गुजराती देश विकत आहेत …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, वरळीतील मोक्याचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी देऊ नका, लिलाव थांबवा ५ हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोल भावाने देऊन महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नियमानुसारच व्यवहार करा
मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्तेची चावी हाती येताच मुंबईतील मोक्याचे भूखंड विकण्यास सुरुवात झाली आहे. वरळीतील महत्वाच्या ठिकाणी असलेला ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत लाडक्या बिल्डरचा देण्याचा घाट घातलेला आहे. हा व्यवहार महापालिकेचे नुकसान करणारा असून बिल्डर व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, वरळीच्या भूखंडाचा लिलाव सरकारची चौकशी होईपर्यंत थांबवा समाजवादी पक्षाचे आमदार शेख यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील एका मोक्याच्या भूखंडाचा लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या असून त्यावरील चाचणी प्रयोगशाळेच्या पुनर्विकासातील अनियमिततेची राज्य सरकारकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत लिलाव थांबवण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी त्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना …
Read More »इराणची स्पष्टोक्ती, महिना भराच्या युद्धात आणि युद्धविरामातही इराण विजयी डॉ अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दिली माहिती
इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी यांनी ठामपणे सांगितले की, तेहरान हे युद्धाचे “विजेते” आहेत आणि मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबद्दलच्या अटकळी फेटाळून लावल्या. ते सर्व गोष्टींवर देखरेख करत असल्याचे त्यांनी सांगितले. एका विशेष मुलाखतीत, डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी यावर जोर दिला की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच “शरणागती” पत्करली …
Read More »
Marathi e-Batmya