Breaking News

मंत्री संजय राठोड म्हणतात, माझ्य़ा मागे अनेक हातधुवून लागलेत..

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते सध्या शिंदे गटातील संजय राठोड यांना शिंदे गटाकडून पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मंत्री करण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्रीही करण्यात आहे. सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना रंगला आहे. मात्र, जनतेची सहानुभूती …

Read More »

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची “त्या” घटनेबाबत केला खुलासा मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ प्रकरण

काल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली असल्याचे चर्चा सुरू असताना त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत …

Read More »

ठाकरे गटाला मिळाले हे नाव आणि चिन्ह मात्र शिंदे गटाला नाव मिळाले चिन्ह नाही त्रिशुळ आणि गदा ही चिन्हे मात्र बाद

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अर्ज करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशुळ आणि गदा ही तीन चिन्हे पाठविण्यात आली. तर उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच त्रिशुळ, उगवता सुर्य, धगधगती मशाल ही चिन्हे पाठविली होती. या …

Read More »

गुंतवणूकदार गोलमेज परिषद पियुष गोयल म्हणाले, महाराष्ट्र पुन्हा वैभवाचे शिखर गाठेल… उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारचा तो निर्णय म्हणजे, ‘भीक नको पण कुत्रा आवर’

शासकीय खरेदी आधारभूत केंद्राअंतर्गत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीच्या शासकीय निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ई-पीक पाहणी, सातबारासह शेतकऱ्यांची सर्व माहिती सरकारकडे असताना पुन्हा धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑलनाईन नोंदणी करण्यास सांगणे हे गरिब, सामान्य शेतकऱ्यांचा छळ करणारे तसेच अन्यायकारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

मंत्री लोढा यांची घोषणा, दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार 'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. बोरिवली पश्चिम येथील आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत …

Read More »

जर आयोगाच्या यादीत चिन्ह नसेल तर? अनिल देसाई म्हणाले, तर ते चिन्ह देऊ शकतं.. आयोगाच्या यादीत नसलेल्या चिन्हाबाबत अनिल देसाईंची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत शिवसेना हे नाव व पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण वापर करण्यास उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला मनाई केली. त्यानंतर नव्या पक्ष नावासाठी आणि चिन्हासाठी अर्ज करण्याचे आदेश दोन्ही गटाला दिले. मात्र उध्दव ठाकरे यांनी पाठविलेली चिन्हे निवडणूक …

Read More »

आखाड्याबरोबरच राजकिय मैदान गाजविणारे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे निधन वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इटावा येथे ऐन तारूण्यात कुस्तीचा आखाडा ते समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यापासून प्रेरणा घेत राजकारणात प्रवेश करत राजकिय मैदान गाजविणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं आज सकाळी गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, दोघांच्या भांडणात पुण्याई गोठवली… वाडवडीलांनी जे कमावलं पण मुलांनी एका मिनिटात घालविलं

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला आणि उध्दव ठाकरे गटाला मनाई केली. या साऱ्या राजकिय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चिंता व्यक्त करत शिंदे गटाबरोबर शिवसेनेलाही टोला लगवला. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी वक्तव्य …

Read More »

नाना पटोले म्हणाले, भारत जोडो यात्रा आता जनआंदोलन भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या सिव्हिल सोसायटीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो

देशभरातील २२५ सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींनी भारत जोडो यात्रेला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व संघटनांचे प्रतिनिधी शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला यांच्यासह मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सर्वांच्या सहभागामुळे भारत जोडो यात्रा हे एक जनआंदोलन झाले असून आम्ही त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असे काँग्रेस …

Read More »