मुंबई

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास मुदतवाढ आझाद मैदान पोलिसांकडून एक दिवसाची मुदत

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आंदोलनास सुरुवात केली. मात्र दुपारपर्यंत राज्य सरकारकडून चर्चेच्या निमंत्रणाशिवाय काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर दुपार नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सादर केला. त्यावर आज दिवसभराची मुदत …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हटणार नाही आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात

पोलिसांनी मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाची परवानगी दिली. त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. त्यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा आरक्षण समर्थक आंदोलनकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला …

Read More »

आझाद मैदानावरील आंदोलनाची मुदत वाढविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज पोलिसांकडून अद्याप मुदत वाढीचा निर्णय नाही

राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनी आज आझाद मैदानावर आपल्या आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुंबई पोलिसांनी दिलेली एक दिवसाची मुदत आणखी चार दिवसांची वाढविण्यासंदर्भातील एक पत्र मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती पुढे आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या …

Read More »

मनोज जरांगे नावाच वादळ धडकलं…मुंबई मराठामय… दक्षिण मुंबई जाम मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलक मुंबईत

मुंबई पोलिसांनी अटी व शर्तीखाली राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील एक दिवसीय आंदोलनाला परवानगी दिली. त्यानंतर आझाद मैदानावर ५ हजार मराठा आरक्षण समर्थकांना आंदोलन करण्यास परवानगी दिली. मात्र आज पहाटेपासून मुंबईत येत असलेल्या मराठा आरक्षण समर्थकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदान, सीएसटी, परिसरात …

Read More »

विरार मधील इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू नारंगी फाटा येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत रात्री अचानक कोसळली

विरार मधील नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊंडच्या स्वामी समर्थ नगरातील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत काल बुधवारी गणेश चतुर्थीच्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास एका बाजूला कोसळली. या इमारतीमध्ये १५ ते २० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या मलब्याखालील नागरिकांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण संध्याकाळपर्यंत यातील १७ …

Read More »

काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या शाळा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, मंत्री लोढा व सरकारला बांगड्यांचा आहेर

शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली

मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …

Read More »

कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रीम तलावाच्या अनुषंगाने वाढती नाराजी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत …

Read More »

अति भाराने मोनो जागीच रखडलीः विद्युत पुरवठाही झाला खंडीत ३१० प्रवाशांना बाहेर काढले, नागरिकांचे १०४ टनाचे वजन भरले

मंगळवार (१९ ऑगस्ट २०२५) सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे मुंबईत अचानक मोनोरेल गाड्या थांबल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आज अनेक शंभर लोकांना वाचवण्यात आले. म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान मोनोरेल ट्रेन थांबल्याने ५०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले, तर आचार्य अत्रे आणि वडाळा मोनो रेल स्टेशन दरम्यान अचानक थांबलेल्या …

Read More »