राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी …
Read More »जयंत पाटील यांची टीका, नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही प्रशासन ठप्प झाले आहे, लवकर निर्णय घ्या, राज्याचा कारभार सुरू करा
शपथविधी झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप होतात, असा आतापर्यंतचा प्रघात आहे. मात्र अद्यापही सत्तेत आलेल्या नव्या सहकाऱ्यांचा खातेवाटप झालेला नाही. त्यामुळे नव्या सहकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे अद्याप एकमत नाही असे दिसते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. राज्यात अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर अद्यापही राज्याचा प्रशासकीय कारभार सुरळीतपणे सुरू …
Read More »दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध
राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …
Read More »अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले, पण बंगले- दालनांचे वाटप झाले शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्र्यांना घाई
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना मंगळवारी बंगले व दालनांचे मात्र वाटप आज करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला कायम असून अदिती तटकरे …
Read More »मंत्री पदावरून आमदारांनी घातला मुख्यमंत्री शिंदेंना वर्षावर घेरावः इकडे अधिकारी मात्र ताटकळत रायगडचा पालकमंत्री भरत शेठ, अध्यक्ष पद नकोय मंत्री पद हवय आमदारांनी धरला हट्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच काकाच्या अर्थात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये एकच खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री शिंदे हे महत्वाच्या बैठकांसाठी मंत्रालयात निघाले. मात्र त्यांच्याच गटातील आमदारांनी मंत्री पदाच्या …
Read More »‘शासन आपल्या दारी’चा पुणे जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी …
Read More »अजित पवार यांच्या त्या मागणीवर मुख्यंमत्री शिंदे म्हणाले, तुमची मागणी नक्कीच पूर्ण करू… विकासाचं त्रिशुळ पाहून विरोधकांना धडकी भरली
राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज धुळे येथे आयोजित करण्यात आला होता, जो काही वेळापूर्वी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात झेंड्यावरुन अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अजित पवार धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना …
Read More »उद्धव ठाकरे यांचा टोला,…तुम्हाला तर वायपेयींनी केराच्या टोपलीतच टाकलं होतं ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्षच गेला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का? असा संतप्त …
Read More »१९८१ पासून सोबत राहिलेले दिलीप वळसे-पाटील काय म्हणाले शरद पवार यांच्याबद्दल ? वाचा आंबेगाव- शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात मांडली भूमिका
मध्यल्या काळात राजकीय घडामोडी झाल्या त्यामधून राज्यामध्ये नवीन समीकरणं तयार झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झाला. मी सुद्धा मंत्रिमंडळात सहभागी झालो. आपण जरी हा निर्णय घेतला असला तरी आपण काही कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी ही वेगळी राहणार आहे. त्याआधारे आपल्याला भविष्यात …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल; तुम्ही तर दोन फुल एक हाफ, मग त्रिशुळ कसे? यवतमाळमधील दिग्रस येथील जाहिर सभेत उद्धव ठाकरे यांचे भाजपावर टीकास्त्र
राज्यात महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपाकडून तीन चाकांची रिक्षा अशी टीका केली जात असे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन चाकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ही आता सहभागी झाल्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे आमचे त्रिशुळ असल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya