ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महानगरांमध्ये तीन दिवसात, शहरांमध्ये सात दिवसात आणि ग्रामीण भागात १५ दिवसात नवे वीज कनेक्शन देण्याच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज कनेक्शनसाठी वाट पहावी लागणार नाही, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महावितरणकडून …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा सीएमई प्रणालीसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सूचना
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (सीएमई) प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी क्रेडीट पॉईंट दिले जातात. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले… खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या
कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते …
Read More »प्रकाश आबिटकर यांची ग्वाही, पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार स्त्री आधार केंद्राच्या वतीने आयोजित विकासासाठी निरंतर वाटचाल
राज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक प्रभावी योजना राबवित आहे. या योजनेसोबत मुलींचा जन्मदर कमी होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींचा जन्मदार वाढीसाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. …
Read More »असर च्या अहवालाला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे उत्तर राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध
असर अर्थात प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ …
Read More »ग्रामीण भागात जास्तीत कारची विक्री होण्याची आशा फाडा संस्थेकडून शक्यता वक्य केली
सामान्य मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खरीपाची चांगली पेरणी तसेच नव्याने निवडून आलेल्या सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत केलेल्या वाढीमुळे ग्रामीण भारतातील खर्चाच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ऑटो रिटेल कामगिरी वाढेल, असे एका उद्योग संस्थेने शुक्रवारी सांगितले. सध्याच्या बाजार परिस्थितीच्या आधारावर, जुलै ऑटो रिटेल कामगिरीसाठी एकंदर रेटिंग सावधपणे मध्यम दृष्टिकोनासह …
Read More »क्रिसिलचा अहवाल, महसूलात वाढ होण्याची शक्यता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत वाढ होणार
जलद गतीने वाढणारे ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) क्षेत्रामध्ये अपेक्षित वाढीव वाढीमुळे, ग्रामीण भागातील मागणी आणि स्थिर शहरी मागणी यांच्या आधारे चालू आर्थिक वर्षात ७-९ टक्के महसूल वाढेल अशी अपेक्षा आहे. हे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अंदाजे ५-७ टक्के वाढीचे असल्याचे आशादायक चित्र क्रिसिल रेटिंग्सच्या अहवालात देण्यात आले आहे. क्रिसिल रेटिंग्सचे संचालक …
Read More »आगामी अर्थसंकल्प छोटी शहरे आणि ग्रामीण भागावर आधारीत अर्थमंत्रालयाकडून माहिती मागविण्याचे काम सुरु
२२ जुलै रोजी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याआधी, अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालयांना आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि लहान शहरे आणि ग्रामीण भारतामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी धोरणात्मक सूचना मागविण्यास सांगितले आहे. मंत्रालयांना इतर गोष्टींबरोबरच ग्रामीण आणि लहान शहरांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक इनपुट्स आणण्यास सांगितले आहे; या भागात सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल …
Read More »धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी योजना राबवणार
राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेची …
Read More »अबब… बेरोजगारीने गाठला सर्वोच्च उच्चांक दोन वर्षातील सर्वोच्च पातळीवर
या महिन्यात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारसाठी एक वाईट बातमी आली आहे. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने दावा केला आहे की ऑक्टोंबर २०२३ मध्ये भारतात बेरोजगारी २ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, …
Read More »
Marathi e-Batmya