महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्राची तीन हजार …
Read More »१ लाख ४२७ मतदान केंद्रांवर ९ कोटी ७० लाख मतदार आपला हक्क बजाविणार मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १,००,४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी …
Read More »मुंबईत ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान १९८ दिव्यांग मतदारांनीही बजावला गृह मतदानाचा हक्क
मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येकाचे …
Read More »निवडणूक आयोगाकडून आता दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष
महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित …
Read More »निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार नाशिकमध्ये सर्वाधिक ४५ महिला नियंत्रित मतदान केंद्र
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये …
Read More »नाना पटोले यांची मागणी, आयोगाने पोलिस महासंचालक वर्मा यांच्या नियुक्तीबाबत हस्तक्षेप करावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्र सरकारने संजय कुमार वर्मा यांची पोलीस महासंचालक (DGP) म्हणून सशर्त नियुक्ती करण्याची कृती ही घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि स्थापित प्रशासकीय तत्त्वे यांचे उघड उघड उल्लंघन करणारी आहे. यामुळे पोलीस महासंचालकांना निवडणुकीच्या काळात तटस्थ व निष्पक्षपणे काम करण्यात अडचणींचा सामना करावा लागले म्हणून निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर …
Read More »मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला उच्च न्यायालयात आव्हान निवडणूक आयोगाच्या नियमाच्या विरोधात मनसेकडून उच्च न्यायालयात याचिका
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसुचनेला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. लवकरच याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल फोन आणण्याची आणि डिजीलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी १ लाखांहून अधिक मतदान केंद्र निवडणूक मुख्याधिकारी कार्यालयाची माहिती
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे …
Read More »निवडणूक मुख्याधिकारी यांची स्पष्टोक्ती, कोणत्या पदावर कोणाला ठेवायचे याचे अधिकार आयोगाकडे शरद पवार यांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे आदेश, सर्व गाड्या तपासा
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya