Tag Archives: महिला सुरक्षा

महिलांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना ५० हजारांचा दंड महिला व बालविकास अधिकारी संजय धनगर यांची माहिती

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण)अधिनियम कायदा-२०१३ च्या कलम २६ नुसार शासकीय किंवा खासगी कार्यालये अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणार नाहीत अशा कार्यालयांना रुपये ५० हजार दंड आकारण्याची तरतूद आहे. अशी समिती न करणे आणि कायद्यातील व नियमातील तरतुदीचे आणि जबाबदारीचे पालन न केल्यास परवाना रद्द …

Read More »

रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी रोहिणी खडसेंचा संताप, नेमका आका कोण? छेडछाडीच्या घटनेस १० दिवस झाले तरी तीन आरोपी अद्यापही फरारच

केंद्रीय राज्यमंत्री तथा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. मात्र त्यानंतर थोडी हालचाल होत एकाला अटक करण्यात आले. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साधला संवाद

महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी …

Read More »

परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती, एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीनंतर दिली माहिती

काही दिवसांपूर्वी पुणे येथील बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षिय युवतीवर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एसटी स्थानकातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. तसेच या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून सुरक्षा रक्षकांची समिती स्थापन करून …

Read More »

नाना पटोले यांची टीका, अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज सावित्रीबाईंच्या कर्मभूमीतच महिला असुरक्षित, महिला सुरक्षा वाऱ्यावर आणि शासन व प्रशासन भ्रष्टाचारात मग्न

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेलेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यांना फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित आहेत पण सरकारने याची जबाबदारी घेऊन गुन्हेगारांवर कडक …

Read More »

रेल्वेप्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

महिलांना रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित वातावरण असावे. अनुचित घटना होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर महिला अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. ‘रेल्वेमधील प्रवासी महिलांची सुरक्षा’ या विषयाच्या अनुषंगाने आज विधान भवनातील सभा कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी या बैठकीत मागील …

Read More »