साधारणतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला दोन वर्षे दोन महिने पूर्ण झाले. या दोन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक गोष्टींबाबत निर्णय घेतला. मात्र केंद्रातील सरकारच्या धर्तीवर आश्वासक अनेक गोष्टींच्या घोषणा करायच्या परंतु निर्णय एकही घ्यायचा नाही …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, या क्षेत्रांवर ‘मित्र’ने विशेष लक्ष… मित्रच्या संचालक मंडळाची बैठक
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्याचे उद्दिष्ट साध्य करतानाच ‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि राज्याच्या विकासाला देखील मोठा हातभार लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. यावेळी महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना …
Read More »एसटी महामंडळ कृती समितीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक उच्चाधिकार समितीने बैठक घेऊन आठवडाभरात अहवाल सादर करावा
राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन
समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन …
Read More »विधानसभाध्यक्षांनी निर्देश देऊन जयभिम नगरचे रहिवाशी छपराच्या प्रतिक्षेत काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम पक्षाने मुद्दा उपस्थित करूनही अद्याप सरकारकडून निर्णयाची अंमलबजावणी नाहीच
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही इमारतीवर किंवा वस्तींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आसरा अर्थात निवासी घरावर कारवाई करता येत नाही. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अधिनियमात तशी तरतूदही आहे. तरीही मुंबई महापालिकेकडून पवई येथील जयभिम नगरातील रहिवाशांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेने कारवाई करत रस्त्यावर आणले. या कारवाईवरून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी नवीन धोरण एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील इस्टेट, शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक …
Read More »१२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊंचे साहित्य लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभ अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध असून त्यांचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास आहे. तो उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडले आहे. त्यांचे साहित्य वीस पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून त्यांचे साहित्य जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अण्णा भाऊ …
Read More »शाब्बास स्वप्नील…ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटींचे पारितोषिक जाहीर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद
शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष …
Read More »पद सोडण्यासाठी राज्य सरकारचा दबाव, दोन आयएएस अधिकारी… केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार घटवण्याचे प्रयत्न
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पध्दतीवर संपूर्ण देसभरातूनच अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणूकीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश बाजूला सारत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्यात बदल करत आयत्यावेळी नवा अध्यादेश जारी केला. तसेच विविध पातळीवरून निवडणूक आयोगाचे काम संशयातीत राहिले. …
Read More »
Marathi e-Batmya