सातारा: प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार …
Read More »अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …
Read More »सहकारी संस्थांना आता वार्षिक सर्वसाधारण सभा प्रत्यक्षही घेता येणार मात्र अट ही ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्थांना सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे
मुंबई : प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यावर निर्बंध आल्याने या संस्थांना आपले कामकाज चालविणे अवघड झाले होते. मात्र आता यावर राज्य सरकारने तोडगा काढत सहकारी संस्थांना या सभा घेण्यास परवानगी देत मार्गदर्शक तत्वे जाहीर जाहिर केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळणे आवश्यक …
Read More »आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; तात्काळ पंचनामे करा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. …
Read More »सैन्यदलाची मदत मिळणार: पालकमंत्री, लोकप्रतिनिधींनो जिल्हा सोडू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि सूचना
मुंबई : प्रतिनिधी रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »अजित पवारांचे आदेश, वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या पुन्हा जोडा वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समितीचा १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करा-उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची …
Read More »मुंबईतल्या ५०० गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांची एसआयटीमार्फत चौकशी करा भाजपा नेते माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांची सहकार आयुक्तांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोविडचा फायदा घेत मुंबईत ५०० गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव बिल्डरांना मंजूर करुन दिले. २ हजार कोटींच्या गौडबंगालाला तातडीने स्थगिती देऊन एसआयटी मार्फत चौकशी करा, असे मागणी करणारे पत्र भाजपा नेते, माजी मंत्री आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज सहकार आयुक्त अनिल …
Read More »कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर विधेयकावर जनता, शेतकरी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सूचना मागवल्या
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार आहे. वास्तविक पाहता कृषी संबंधी कायदे हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकारने त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना वाचवण्यासाठी व शेतक-यांच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी …
Read More »पीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा मिळणार असल्याचे असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री पाटील …
Read More »शरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »
Marathi e-Batmya