राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »छत्रपतींच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात जाणता राजा महानाट्याला हजेरी लावल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली, अशा शब्दांत भारतरत्न सचिन तेंडुलकर याने आज भावना व्यक्त केल्या. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून पहिल्या प्रयोगा पासूनच …
Read More »‘दिवाण-ए-आम’ मधील शिवजयंती उत्सवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हजर राहणार महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार
आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची …
Read More »संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी माफी मागितली तर मोदी जयजयकार का करतात?
काल दिवसभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजाविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी मागितली तर मग महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, शिवजयंती नेमकी कधीची खरी, तारखेची की तिथीची? मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीवरून केला मुद्दा उपस्थित
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे बोलण्यास उभे रहात म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्यात ज्या दिवशीही महापुरूषांची जयंती असले, त्यादिवशी सभागृहात महापुरूषांच्या फोटोची फ्रेम सभागृहात लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार जयंती साजरी करण्यात आली. मात्र आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी …
Read More »उदयनराजें म्हणाले की, राज्यपालांच्या त्या वक्तव्याने… राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
औरंगाबादेत काल आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रामदास स्वामींशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्याने वादंग निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर विविधस्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १६ वे वंशज छत्रपती उदयन राजे भोसले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून छत्रपती शिवाजी …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ? औरंगाबादेतील समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात केले वक्तव्य
मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते …
Read More »म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काँग्रेसवर टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचं काम काँग्रेसने सातत्याने केलं. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही. देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदींशी तुलना ही भाजपाच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक छत्रपती शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न:- सचिन सावंत
मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे निदर्शक आहे. भाजपाच्या या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचा …
Read More »शिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय? मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya