मुंबई : प्रतिनिधी सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे. या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या …
Read More »राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला वित्तमंत्री कोण ? याची माहितीच नाही शासन निर्णय निघाला वित्तमंत्र्यांच्या नावे मात्र समितीच्या अध्यक्षपदी भुजबळांचे नाव
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून दिली जाते. मात्र राज्याचे वित्त अर्थात अर्थमंत्री नेमके कोण याचा विसर या विभागाला पडला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने नेमके अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील कि अन्न व नागरी पुरवठा …
Read More »तांदळाचे ९ वाण शोधणारे स्व. दादाजी खोब्रागडे यांचा मरणोत्तर पद्म पुरस्कार द्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी सुप्रसिद्ध कृषी संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ …
Read More »कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले …
Read More »फडणवीस म्हणाले, सरकारने पॅकेज जाहीर केले पण त्याचा फायदा नाही कोकणातील परिस्थितीबाबत सर्वंकष निवेदन सरकारला देणार
दापोली: प्रतिनिधी आज सरकारचे अस्तित्त्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो तरी पण, त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा …
Read More »मुंबईतल्या गटारी, नद्यांमधील पाण्याची हालचाल आणि पूराची पूर्वसूचना मिळणार एकात्मिक पूर यंत्रणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इंटिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पुर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या …
Read More »लॉकडाऊनमध्ये मालवाहू “एस.टी” ने कमाविले २१ लाख रूपये लालपरीचं असंही "संजीवन" रुप, ५४३ फेऱ्यात ३ हजार टनाची मालवाहतूक
मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रत्येक विभागात १० प्रमाणे ३३० बसेसचे मालवाहतूक बसमध्ये रुपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असून आतापर्यंत ७२ बसेस मालवाहतूकीसाठी तयार झाल्या आहेत. एस.टी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून ३०० मालवाहतूक बस (ट्रकमध्ये रुपांतरीत) कार्यरत आहेत. म्हणजेच आजघडीला ३७२ बसेस मालवाहतूकीसाठी उपलब्ध असून जनसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली लालपरी आता मालवाहतूकीच्या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या अख्यारितील विभागाच्या कर्मचाऱ्यांना मे चे वेतनच नाही ५५ लाख रूपयांची माहिती न दिल्याने वित्त विभागाने पगार थांबविला
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे या भलेही राज्य सरकारच्या तिजोरीत कडखडाट होत आलेला असला तरी सरकारने कर्ज काढून शासकिय कर्मचाऱ्यांना कर्ज काढून पगार दिले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असलेले उध्दव ठाकरे यांच्या अखत्यारीतील जनसंपर्क विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जूनची १५ तारीख उजडत आली तरी त्यांना मे महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नसल्याची …
Read More »कोरोना: लागोपाठ दुसऱ्यादिवशी सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद १५२ जणांचा मृत्यू तर ३ हजार ३६०७ नवे रूग्ण
मुंबई: प्रतिनिधी काल सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्यादिवशी १५२ जणांच्या मृत्यूची नोंद तर ३ हजार ६०७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या ९७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक रूग्ण …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री म्हणाले, परिक्षेपेक्षा शिक्षण महत्वाचे एचएसएनसी समुह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या आपलकालीन परिस्थितीत परिक्षा घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे देता येईल हे पाहणे महत्वाचे असल्याचे सांगत परिक्षा रद्दच्या …
Read More »
Marathi e-Batmya