देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मोदीजी, गेल्या ९ वर्षात १०० लाख कोटी रुपयांचे कर्ज केले ते विसरलात का ? कर्नाटकवरचे कर्ज ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारचेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर खोटे आरोप केले. कर्नाटक व राजस्थान सरकारने कर्जाचा डोंगर उभा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. वास्तविक पाहता कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन दोन महिनेच झाले आहेत. त्याआधी कर्नाटकात भाजपाचे सरकार होते. कर्नाटकातील ४० टक्के कमीशनवाल्या भाजपा सरकारनेच कर्जाचा डोंगर उभा करुन …
Read More »शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मणिपूरचा हिंसाचार हे गुजरातचे मॉडेल हिंसाचार प्रकरणात बरेचसे साम्य
आरएसएस आणि भाजपा संत्तेत आल्यापासून देशात मुस्लिम दलित आदीवासी विरोधी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या मणिपुर मध्ये सुरू असलेला हिंसाचार २००२ मध्ये झालेल्या गुजरात हिंसाचाराचे मॉडेल आहे.गुजरातमध्ये मुस्लिम विरोध होता तर मणिपुरमध्ये मैतेईचा वापर होत आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रदेश कार्यालयात …
Read More »अतुल लोंढे यांचे स्पष्ट मत,… शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ? जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, विरोधी पक्ष सरकारला जागे करेल
सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत …
Read More »काँग्रेसने दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरविल्याची जाहिरात मणिपूर प्रश्नी कोणी प्रश्न विचारू नये
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन पाच ते सहा दिवस झाले आहेत. या कालावधीत काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकिय विरोधी पक्षांकडून मणिपूर मधील हिंसाचार प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावं अशी मागणी करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीतच चर्चा करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र मणिपूरसह इतर काँग्रेस शासित राज्यात महिलांवर …
Read More »महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा
राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास …
Read More »संसदेत विरोधक पंतप्रधानांची वाट बघतायत, तर पंतप्रधान मुख्यमंत्री गेहलोतांच्या… पीएमओने भाषण हटविल्याने अशोक गेहलोत ऑनलाईन पध्दतीने उपस्थित
एकाबाजूला अडीच महिन्याहून अधिक काळ मणिपूर राज्यातील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच दिवसेंदिवस तेथील नवनवीन घटनांचे धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरप्रश्नी आपले मत मांडावे यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जायलाही …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १ लाखांहून अधिक किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार २७ जुलै रोजी राजस्थानातील सिकर येथे एका कार्यक्रमात १.२५ लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत. या केंद्रातून खत विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना माती परीक्षण, बियाणे चाचणी अशा अनेक सेवा- सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी …
Read More »
Marathi e-Batmya