वारकरी संप्रदायात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. तसेच त्यांच्या किर्तन सादर करण्याच्या पध्दतीमुळे आणि वास्तवतेतील उदाहरणे देत राज्यातील लोकांमध्ये मनोरंजन आणि अध्यात्मिकतेचे बाळकडू पाजत असतात. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »आदित्य ठाकरेंची खोचक टीका, अर्थसंकल्प पालिकेचा की वर्षावरील कंत्राटदारांचा हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण कोणतीही करवाढ नसणारा आणि शिलकी अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून शिवसेनेचे आमदार आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि आयुक्तांवर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी बनवलेला …
Read More »पिंपरी-चिंचवडच्या जागेवर शिवसेनेचा दावा मात्र अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता
नुकत्याच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपा-शिंदे गटाचा दोन ठिकाणी महाविकास आघाडीने पराभव केला. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहिर असून या दोन्ही जागा महाविकास आघाडी लढविणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. तसेच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही …
Read More »अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …
Read More »मविआचा उमेदवार पराभवाच्या छायेत असताना अजित पवारांचे मोठे विधान सत्यजीत तांबेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
नाशिकमधील तांबे पिता-पुत्रांनी केलेल्या बंडाला भाजपाने दिलेली साथ आणि निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील या पराभवाच्या छायेत आहेत. तसेच निवडूण आल्यानंतर सत्यजीत तांबे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाशिकच्या जागेवर सत्यजीत …
Read More »शिवसेनेची टीका, हा तर दगाबाज सरकारचा अर्थसंकल्प विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका
सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर केला, मात्र सामान्य जनतेला दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात शेतीच्या दृष्टीने …
Read More »शिंदे गटाने आयोगासमोरील लेखी युक्तीवादात केला दावा, राऊतांच्या धमक्यांमुळे आमदार पळून गेले आम्ही बंड नाही तर उठाव केल्याचा शिंदे गटाकडून लेखी निवेदनात उल्लेख
केंद्रिय निवडणूक आयोगापुढे ठाकरे विरूद्ध शिंदे गट आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. अशात आज (सोमवारी) लेखी युक्तिवाद दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात दावा दाखल केला आहे. या सगळ्यात लेखी युक्तिवादात संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाने मोठा आरोप केला आहे. निवडणूक आयोगात आता पुढे काय होणार? पक्ष आणि चिन्ह कुणाला …
Read More »निवडणूक आयोगासमोर आज ठाकरे गटाने मांडले म्हणणे, अनिल देसाईंनी दिली माहिती शिंदे गटाचा दावा चुकीचा, उध्दव ठाकरे गटाचा दावा
शिवसेना पक्ष कोणाचा याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडत शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे आयोगास सांगितले. तसेच ठाकरे गटाने आपलं म्हणणं ई-मेलद्वारे आयोगासमोर सादर केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार आणि …
Read More »शिवसेना कुणाची? अजित पवार यांनी सांगितली ‘ती’ माहिती निवडणूक आयोगाची शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या अर्जावर उद्या सुनावणी
जवळपास ६ महिन्यांपासून शिवसेना कोणाची या मुद्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत असून या प्रश्नाचा वाद सध्या केंद्रिय निवडणूक आयोगासमोर आणि सर्वोच्च न्यायालयातही सुरु आहे. त्यातच केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारी रोजी या दोन्ही गटांच्या वादावर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »संजय राऊत यांचा शिंदेंना टोला, कल्याण-डोंबिवलीची जागा राखली तरी पुरे… मुख्यमंत्री शिंदेच्या दाव्यावर राऊतांचा टोला
देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद रंगला आहे. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी …
Read More »
Marathi e-Batmya