मुंबई

पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प

भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबरील चर्चेनंतर शिक्षक संघाचा बहिष्कार मागे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती. …

Read More »

बांद्रा-कुर्ला संकुलातील अन्न चाचणी प्रयोगशाळेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा …

Read More »

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

देशातील लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहिता लागू करण्याचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काल केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या आयएएस अधिकाऱ्यांची सेवा एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झाले आहेत, अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबई …

Read More »

आदित्य ठाकरे यांचे उद्विग्न उद्गार ,… आणि भ्रष्टाचार पाहून मी थक्क झालो

मुंबईतील कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांनी खटला दाखल करून घेत मुंबई महापालिका आणि शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लोकायुक्त कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्यानुसार आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त हे ही हजर होते. यावेळी लोकायुक्तांनी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजीची तारीख ठेवली आहे. पहिली सुनावणी झाल्यानंतर आदित्य …

Read More »

मुंबई उपनगरात महासंस्कृती महोत्सवांतर्गत बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, ‘मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे’आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

शिवसेनेच्या रस्त्यावरच्या इतिहासाला पुस्तक रूप देणारे मनोहर जोशी अनंतात विलिन

शिवसेनेची स्थापना ते १९९३ साली महाराष्ट्राच्या सत्तास्थानी विराजमान होत शिवसेना-भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री ते शिवसेनेचे पहिलेच लोकसभाध्यक्ष ठरलेले मनोहर जोशी यांनी वयाच्या ८६ व्या हिंदूजा रूग्णालयात वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत शासकिय इतमामाते अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंड …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केले उद्घाटन मुंबईतल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

राज्यपालांच्या अभिभाषणाने विशेष विधिमंडळ अधिवेशनाची सुरूवात

शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून २०२७-२८ पर्यंत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी …

Read More »

अजित पवार म्हणाले, अल्पसंख्याकांच्या समस्यांकडे लक्ष, मुलींच्या शिक्षण…..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा आज नवी मुंबईतील वाशी इथं पार पडला. अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर या राज्यस्तरीय मेळाव्यात मंथन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातून आलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केले. …

Read More »