औरंगाबादः प्रतिनिधी
शिवसेनेचे जेष्ठ नेते यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करायचा की नाही हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ तयार केल्यानंतर त्या मध्ये चंद्रकांत खैरेंचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर भाष्य फक्त शिवसेना नेतृत्वच करु शकते. शिवसेनेमध्ये या संदर्भात काही हालचाली सुरु आहेत की नाही याचीही माहिती माझ्याकडे नसल्याचे ते म्हणाले.
चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत. उध्दव ठाकरेंच्या जवळचे आहेत. पक्षावर त्यांची पकड ही आहे. हे सगळेच मान्य करतात. निर्णय शिवसेना घेईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Marathi e-Batmya