भिवंडी (पूर्व) येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून येत्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सशस्त्र दलांनी दिलेल्या जलद आणि निर्णायक प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव मांडण्याची मागणी केली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचिती भाजपाकडून खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन
ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून जिंकलेल्या या युद्धाने भारताची ताकद व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’ची झलक संपूर्ण जगाला दिसली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ऑपरेशन सिंदूर …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय
पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …
Read More »समांतर निवडणुकीसंदर्भात संयुक्त समितीची महाराष्ट्रातील नेत्यांशी व बँकिंग क्षेत्राशी सखोल चर्चा एक देश एक निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चा
भारतीय संविधान (१२९वा सुधारणा) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भात गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, रिझर्व बँक ऑफ इंडिया, विविध बँका व विमा कंपन्यांशी विस्तृत सल्लामसलत केली. मुंबईच्या ताज हॉटेल येथे आज समांतर निवडणूक …
Read More »नागपूरमधील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या भांडेवाडीतील महापालिकेच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाची आज शनिवारी (१७ मे) पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, …
Read More »सैन्यदलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर ”सिंदूर यात्रा’’ भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांची माहिती
पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा आपल्या भगिनींच्या अश्रूचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या शाळेवर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरातील दयानंद आर्य कन्या संस्थेवर कठोर कारवाई करावी
नागपूरातील हिंसाचारानंतर धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य कन्या विद्यालया’ने प्रवेश नाकारले, त्या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांप्रती कोणताही धार्मिक भेदभाव करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकिद राज्यातील सर्व शाळांना देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »अजित पवार यांची माहिती, नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी नांदेड, संभाजीनगर जिल्ह्यांसाठी १९१ कोटींच्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांच्याच पुढाकारामुळे बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला …
Read More »“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी भाजपाकडून सातत्याने सैन्यांचा अपमान, मोदी व नड्डांनीच माफी मागावी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा व मंत्री विजय शाह दोघांवरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. मध्य प्रदेशचा एक मंत्री विजय शाह यांच्या बेताल विधानानंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदिश देवरा यांनी केलेले विधान भारतीय सैन्य दलाचा अपमान …
Read More »
Marathi e-Batmya