उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले

शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी पंतप्रधान आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. पवारांनी शेतकऱ्यांची ७० हजार कोटींची कर्जे माफ केली असे खोचक उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

रायगडमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार आनंद गीते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो, त्यावेळी समोरच्या खुर्च्या रिकाम्या असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेला आलो की काय, असा प्रश्न मला पडला. आता त्यांच्यात खुर्च्यांसाठी लढत आहे, मात्र बाहेरच्या सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत. व्यासपीठावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि शेकापचे प्रतिनिधी आहेत. एक काळ असा होता की आमच्यात भांडणे व्हायची, आता नवे समीकरण तयार झाले आहे. आता फक्त मी आणि मी सुरुवात केली आहे, या विरोधात आम्ही एकजूट झालो आहोत. आपल्यापैकी एक व्यक्ती नाही तर दृष्टीकोन आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा उल्लेख केला नाही. याचे कारण स्टेजवर कोणीतरी बसले होते. शरद पवारांनी शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही, तर शरद पवारांनीच ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली असे खोचक उत्तर देत ते पुढे म्हणाले की, सुडाचे कितीही राजकारण केले तरी एक दिवस शेतकरी बाहेर येऊन भ्रष्ट राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वासही व्यक्त केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान गुरुवारी शिर्डीत आले होते. मराठा आरक्षणाबाबत ते काही बोलतील अशी अपेक्षा होती, पण ते काहीच बोलले नाहीत. कोणत्याही ज्वलंत विषयावर ते बोलत नाहीत हे त्यांचे कौशल्य आहे. मणिपूर जळत होते, कोणी बोलत नव्हते, लोक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत, आत्महत्या करत आहेत, पण कोणाला बोलायचे नाही.

मोदी तेव्हा की आता खोटे बोलत आहेत – पवारांच्या उल्लेखावरून रोहित पवारांचा पंतप्रधानांना सवाल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर बोलायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठी माणूस चटकन उत्तर देणारा माणूस आहे. अजित पवारांसारखे नेते गप्प बसले तर आम्हाला ते आवडणार नाही. बारामतीतील शेतकऱ्यांना विचारा शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? बारामतीत आल्यावर पंतप्रधान म्हणाले होते की, शरद पवार यांना शेतीचे चांगले ज्ञान आहे आणि मी शरद पवारांचे बोट धरून राजकारण शिकलो आहे. तेव्हा मोदी खोटे बोलत होते की आता खोटे बोलत होते, हे स्पष्ट व्हायला हवे, असा सवालही उपस्थित केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *