महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, एमएमआरडीएकडून चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (MMRDA) कडून देशातील सर्वात मोठा सामंजस्य करारावर हस्ताक्षर सोहळा पार पडला. आज एकाच वेळी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या …
Read More »गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामराची उच्च न्यायालयात धाव; तातडीची सुनावणी मंगळवारी उच्च न्यायालयाकडून सुनावणी
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हस्यकलाकार कुणाल कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर मंगळवारी तातडीची सुनावणी होणार आहे. मात्र, अंतरिम संरक्षणासाठी संबंधित एकलपीठाकडे दाद मागण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. कुणाल कामराच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती कुणाल कामराच्या वतीने …
Read More »कुणाल कामराचे मुंबई पोलिसांना पत्रः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून जबाबास तयार तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कुणाल कामराचे पत्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे वादात सापडलेल्या स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे रेकॉर्ड करण्याची विनंती केली आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची विनंती खार पोलिस स्टेशनने त्याला तीन समन्स जारी केल्यानंतर, पत्राद्वारे केली आहे. वादग्रस्त विधानाच्या संदर्भात चौकशीसाठी …
Read More »राहुल कनाल यांचे बुक माय शोला कुणाल कामरा विरोधात पत्र कामराच्या सर्व शो चे तिकीट बुकिंग आणि कंटेन्ट हटविण्याची केली मागणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हणल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यात तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर पुन्हा हजर झाला नाही. “त्यांना ३१ मार्च रोजी तिसरे समन्स बजावण्यात आले आणि त्यांना शनिवारी आमच्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. “पण, तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला नाही,” असे एका …
Read More »हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे ‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश
राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘ जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या …
Read More »एकनाथ शिंदे यांचा खोचक सवाल, युटी UT म्हणजे यूज अँड थ्रो म्हटले तर चालेल का? ‘वक्फ’ला विरोध करुन हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करुन उबाठाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचे सोडले यावर शिक्कामोर्तब झाले, अशी सडकून टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. वक्फ बोर्ड विधेयकावरुन उबाठाचा नेतृत्वाचा वैचारिकदृष्ट्या गोंधळ उडाला असून त्यांचे भवितव्य अंधकारमय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना, शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती संकेतस्थळांवर उपलब्ध सर्व विभागांनी उपलब्ध करून द्यावी
राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची खैरात करणाऱ्या महायुतीचा ‘गजनी’ झाला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya