Tag Archives: भाजपा

कोअर बैठकीनंतर आशिष शेलार यांचा विश्वास, विधासभा निवडणुकीत महायुतीच पंकजा मुंडे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ग्वाही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भाजपा लढणार आहे. सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. आशिष शेलार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …

Read More »

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ठरावावर काँग्रेसने व्यक्त केली नाराजी पत्र लिहित के सी वेणूगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, राजकीय संदर्भ देणे, तेही पदभार स्वीकारण्याच्या दिवशी, “खूप धक्कादायक” आणि “संसदेच्या इतिहासातील आश्चर्य कारक” होता. “अध्यक्षांकडून असा राजकीय संदर्भ घेणे संसदेच्या इतिहासात आर्श्चयकारक आहे. नवनिर्वाचित सभापतींच्या ‘पहिल्या कर्तव्या’पैकी एक म्हणून अध्यक्षपदावरून येणारे हे आणखी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल

राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या …

Read More »

लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारून पराभव झाला. त्यामुळे भाजपाकडून सातत्याने जूना जोडीदार म्हणून उद्धव ठाकरे यांना सातत्याने चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. त्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटे नॅरेटीव्ह, तर अजित पवार यांची ग्वाही उत्तरे आमच्याकडे विरोधकांच्या पत्रातील मुद्यावरून सरकारची तयारी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे. राज्य सरकारचे हे शेवटचे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सह्याद्री येथील चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य सरकारच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य …

Read More »

अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा …

Read More »

भाजपाला विश्वास, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार महायुती सरकारच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूलथापांना आता राज्यातील मतदार भुलणार नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच विजय मिळवेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) नगरपालिकेच्या काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

राहुल गांधी यांचा पलटवार , मोदी-शाह यांचा राज्यघटनेवर हल्ला आणीबाणीच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पलटवार

१८ व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचे नाव न घेता आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा

केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …

Read More »