Tag Archives: भाजपा

माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा, पंकजा मुंडे यांचे आवाहन अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची..माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा..आई बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तरूणांना केलं आहे. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात..शांत व सकारात्मक रहा अशा शब्दांत संयम राखण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही, देवेंद्र फडणवीस यांची मात्र सारवासारव लोकसभा निवडणूकीत फक्त अजित पवार गटाला एक जागा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अजित पवार गटाला बारामतीतील घरची जागा राखता आली नाही. यापार्श्वभूमीवर फक्त रायगडमधील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे याचा विजय झाला. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने चक्क ७ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली. भाजपा आमदारांच्या …

Read More »

धनंजय मुंडे यांचे आवाहन, सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपायची जबाबदारी प्रत्येकाची निवडणुकीत जय-पराजय होत असतात; सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला; विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष …

Read More »

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, अन्यथा निवडणूकीत नावे घेऊन… सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करा

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील सगेसोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ द्यावा या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत वाट पाहिली. मात्र मार्च महिन्यात आचारसंहिता जारी झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी काही काळ मराठा आरक्षणाचे आंदोलन काही काळ स्थगित ठेवले. आता केंद्रात नवे …

Read More »

नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी, संध्याकाळी ६ वाजता होणार शपथविधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केला सत्तास्थापनेचा दावा

लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर झाल्यानंतर सर्वाधिक जागा एनडीएला मिळाल्या. त्यानंतर एनडीएची बैठक आज संसदेत बैठक झाली. या बैठकीत एनडीएच्या सर्व सदस्यांनी एकमताने लोकसभा सभागृहाच्या नेते पदी नरेंद्र मोदी यांची निवड केली. त्यानंतर एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनीही नरेंद्र …

Read More »

मनसेने पुन्हा घेतली निवडणूकीच्या रिंगणातून माघार अभिजित पानसे पुन्हा अर्ज काढून घेणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला …

Read More »

भाजपाकडून एनडीएतील सहकाऱ्यांसाठी आखली सीमारेषा चंद्राबाबू नायडू आणि नितीनकुमार यांना हवे असलेल्या मंत्री पदाबाबत नकारघंटा

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांची मागणी केली आहे. तथापि, भाजपा आपल्या मित्रपक्षांना काही प्रमुख पदे सहजासहजी स्वीकारू शकत नाही आणि संरक्षण, वित्त, गृह …

Read More »

सीआयएसएफच्या महिला सुरक्षा कर्मचारीने कंगना राणौत यांच्या श्रीमुखात भडकावली शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्यावरून मारली

चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिनेता-राजकारणी बनलेल्या खासदार कंगना राणौतने यांच्या श्रीमुखात लगावल्याचा आरोप केला. साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) पोलिसांनी द हिंदूला पुष्टी केली की कंगणा राणौत आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाची घटना घडली. सदर सीआयएसएफने कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …

Read More »