Tag Archives: भाजपा

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे चित्र देशाच्या राजकारणात पाह्यला मिळू लागले. त्यातच गुजरातमधील सूरत येथे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद ठरवित भाजपा उमेदवाराला बिनविरोध घोषित केले. अगदी त्याच पध्दतीने मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवाराने लोकसभा निवडणूकीत …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …मोदींना निवडणूक आली की महाराष्ट्र आठवला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून तेच तेच काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाची राजकिय ताकद म्हणावी इतकी सशक्त राहिली नाही. त्यामुळे या भागातील मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांवर पराभवाची छाया असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पी चिदंबरम यांचे मोठे वक्तव्य, कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत तिसरी अर्थव्यवस्था एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला गौप्यस्फोट

कोणीही पंतप्रधान झाला तरी भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पुढे बोलताना पी चिदंमबरम म्हणाले की, लोकसंख्येचा आकार पाहता भारत हा पराक्रम करेल आणि त्यात “कोणतीही जादू” नाही. तथापि, जागतिक क्रमवारीत भारताने प्रतिष्ठित तिसऱ्या स्थानावर केव्हा प्रगती …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, चिकन मटन मासे खाण्यावर बंदी आणणारे सरकार…

उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले . तसचं ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही.’ हा विश्वास उपस्थितांना दिला. मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …

Read More »

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजा मुंडे आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, संविधान बदलण्यासाठीच यांना ४०० जागा पाहिजेत

आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत. हे पाहिल्यानंतर चिंता वाटते. नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. हुकूमशाही करणाऱ्याला खड्या सारखे बाजूला काढू टाका असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले. सासवड येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ …

Read More »

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनात अब की बार ४०० पार चा नारा दिला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ये काँग्रेस की गॅरंटी या शब्दाची नकल करत भाजपा सरकारऐवजी मोदी सरकार की गॅरंटी हा शब्दप्रयोगही राजकारणात आणला. मात्र मोदी …

Read More »