Tag Archives: मुंबई उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मविआचे बंद ऐवजी काळ्या फिती आंदोलन शरद पवार, नाना पटोले आणि शिवसेना उबाठा कडून भूमिका जाहिर

बदलापूर मधील चिमूरडींवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला राजकिय हेतूनं प्रेरित झालेले आंदोलन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर हे आंदोलना राजकिय हेतूने प्रेरित होते हे दाखविण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने वक्तव्ये करण्यात येत आहेत. विरोधक महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदचे आंदोलन हाणून पाडण्याचे प्रयत्नही सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि अजित …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, राजकिय पक्षांना महाराष्ट्र बंद करता येणार नाही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात अॅड गुणरत्न सदावर्ते न्यायालयात

बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. मात्र सत्ताधारी भाजपाप्रणित महायुती सरकारकडून विरोधकांच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत होते. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी याचिका फेटाळून लावली ९ विद्यार्थ्यींनी दाखल केलेली याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून रोजी शहरातील एका महाविद्यालयातील नऊ महिला विद्यार्थिनींनी हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल, रिसेप्शन हा काही विवाह विधीचा भाग नाही

रिसेप्शन हा विवाह विधीचा भाग मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे सांगितले की, मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाला घटस्फोटाच्या खटल्याचा अधिकार नाही. कारण या जोडप्याने मुंबईत लग्नाचे रिसेप्शन केले होते आणि काही दिवस येथेच वास्तव्य केले होते. . “लग्नाचे सर्व विधी ७ जून २०१५ रोजी जोधपूर, …

Read More »

जी एन साईबाबा यांना निर्दोष सोडताच महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील प्राध्यापक जीएन साईबाबांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काही तासांतच, महाराष्ट्र राज्याने मंगळवारी (५ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांना मोठा दिलासा देताना, उच्च न्यायालयाने आज माओवादी-संबंधांच्या कथित प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्यांची …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्तीः आदीवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नाहीच

राज्यातील धनगर समाजाला आदीवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून करण्यात येत होती. तसेच या प्रश्नावर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आरक्षण लागू करू अशी घोषणा केली. इतकेच नव्हे तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकतानाही धनगर समाजालाही फक्त …

Read More »

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ; सर्वाधिक कमी कालावधी मिळणार अवघे चार दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश

उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली. आता पर्यंत न्यायालयाच्या इतिहासात सर्वाधिक कमी कालावधी न्यायमुर्ती धानुका यांना मिळाला आहे. चार दिवसानंतर धानुका हे …

Read More »

समीर वानखेडे यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा, मात्र ‘या’ अटींवर पुढील सुनावणी ८ जूनला होणार

कार्डीलिया क्रुजवरील कारवाई दरम्यान सिने अभिनेता शाहरूख खान याच्या मुलगा आर्यन खान याच्यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. मात्र या आर्यन खान याला बाहेर सोडण्यासाठी शाहरूख खानकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याप्रकरणाची ठपका एनसीबीने वानखेडे यांच्यावर ठेवला. त्यानंतर भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल …

Read More »

आर्यन खान अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषण… समीर वानखेडे यांने मुंबई उच्च न्यायालयात केले दाखल

सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात शाहरूख खान आणि समीर …

Read More »

समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा अटकेपासून तात्पुरता दिलासा

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यात वानखेडेंनी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र, काही घाण अधिकारी आहेत आणि ते माझ्यावर घाण आरोप करत असल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला. तसेच …

Read More »