काही महिन्यांपूर्वी नाशिक येथील सटाणा येथे राहणाऱ्या निखिल भामरे यांने समाजमाध्यमावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत पण सूचक शब्दात टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून निखिल भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांकडून पवार कुटुंबियांची जाहिर माफी मागितली. त्यानंतर भामरे यास जामिनही मंजूर करण्यात आला. …
Read More »मित्र ना.धों महानोर यांचे निधनः शरद पवार यांची मन हेलावणारी प्रतिक्रिया अखेर वृक्ष उन्मळून पडला
शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र तथा ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज सकाळी निधन झालं. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आपल्या तरल काव्याच्या …
Read More »पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं
देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …
Read More »शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर …
Read More »शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं…. अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यादाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे धुळे येथील मात्र वाय.बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे आज रविवारी ३० जुलै रोजी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे संशोधन …
Read More »उत्पन्न वाढीच्या मुद्यावरून जयंत पाटील हसन मुश्रीफ यांच्यात रंगला वाद पहिल्यादाच राष्ट्रवादीच्या दोन गटातील मंत्र्यांमध्ये रंगला वाद
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्ताधारी गटासोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासह ९ आमदार मंत्र्यांमध्ये आणि शरद पवार यांच्या गटात आतापर्यंत एखाद्या प्रश्नावरून वाद रंगल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसले नव्हते. मात्र आज पहिल्यांदाच अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे आमदारा जयंत पाटील यांच्यात लक्षवेधीवरील …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, सावित्रीबाई यांच्याविरोधात लिखाण करणारे आरोपी कसे सापडत नाहीत? सरकारची भूमिका संशयास्पद; विरोधकांचा सभात्याग
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण एका संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ते आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावरही कारवाई का कऱण्यात आली नाही असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. यावेळी …
Read More »मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !
मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …
Read More »मंदिरात धूप घालण्याच्या मुद्यावरून शिंदे, पाटील यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी दिले हे उत्तर विधान परिषदेत रंगली खडाखडी
नाशिक मध्ये मुस्लिम समुदायाकडून काढण्यात आलेल्या संदल मिरवणूकीच्या मार्गात लागणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात धुप घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावरून राज्यात भाजपाप्रणित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मोठा गदारोळ माजविण्यात आला. त्यामुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्य सरकारने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्या एसटीच्या अनुषंगाने विधान परिषदेत पवार गटाचे आमदार …
Read More »एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न
अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ …
Read More »