Tag Archives: अमित शाह

दस्तुरखुद्द मंत्री आणि सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून एकच शोधः “काही निरोप” घोषणा करणारा मंत्रीच लागलाय यादी-आदेशाची शोधाशोध

राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह ९ जणांच्या शपथविधी वेळी जितकी गुप्तता बाळगली गेली, तितकीच गुप्तता नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत आणि चवथ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाळत आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार, चवथा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कोणाची नावे यादीत आदी गोष्टींची विचारपूस सत्ताधारी शिंदे-भाजपा …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या सततच्या आरोपावर भाजपाचे बावनकुळे म्हणाले, हिंमत असेल तर एकदा… हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुत आहात तर सांगाच तुमचे सुत कोणाशी जुळले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळ मधील दिग्रस येथे काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला,…तुम्हाला तर वायपेयींनी केराच्या टोपलीतच टाकलं होतं ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्षच गेला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का? असा संतप्त …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल; तुम्ही तर दोन फुल एक हाफ, मग त्रिशुळ कसे? यवतमाळमधील दिग्रस येथील जाहिर सभेत उद्धव ठाकरे यांचे भाजपावर टीकास्त्र

राज्यात महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपाकडून तीन चाकांची रिक्षा अशी टीका केली जात असे. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन चाकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ही आता सहभागी झाल्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे आमचे त्रिशुळ असल्याचे …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी …

Read More »

भाजपाच्या युवा नेत्याने केली आदिवासी मुलावर लघवीः हाच का हिंदूत्ववादाचा खरा चेहरा मध्य प्रदेश मधील घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल

भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या समर्थक अंध भक्तांकडून एकही संधी सोडली जात नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून वारंवार त्याचा उल्लेख करत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाते. मात्र दलित-आदिवासी समाजाबद्दल भाजपाच्या हिंदू नेत्यांना किती कळवळा आहे या एक धक्कादायक व्हिडिओ …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले, जे गेले ते ईडीच्या भीतीने… अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह अनेक जण ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार असे दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी …

Read More »

अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार

राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला …

Read More »

संजय राऊत यांचा घणाघात, दिल्लीचे दोन बोके आणि ४० खोके… पंतप्रधान मोदींसह शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येत असलेल्या मुंबईतील कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून आज शनिवारी मुंबईत महामोर्चाच आयोजन करण्यात आलं. या मोर्च्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्च्याला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची कृती ‘रोमच्या निरो’ पेक्षाही असंवेदनशील

मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे …

Read More »