पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही. ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे अशी उपरोधिक टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची खोचक सूचना…तर दिवाळीसाठी गरिबांना हजार रुपये द्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या दिवशी दिवाळी साजरी करण्यावरून दिला खोचक सल्ला
२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत भाजपाचे आणि भाजपाशी संबधित विविध संघटनांचे कार्यकर्त्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी जात अक्षता वाटप करत त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आव्हान जनतेला करत आहे. यापार्श्वभूमीवर वंचित …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…
देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील …
Read More »अतुल लोंढे यांचा पलटवार, …वंचितचा समावेश होण्याच्या भीतीनेच… आघाडीसंदर्भातील चर्चा कोणी नेता पत्रकारासमोर करेल का?
देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर देशपातळीवर इंडिया आघाडी होत आहे व राज्यात महाविकास आघाडी अभेद्य आहे. यात वंचित बहुजन आघाडी जोडली जाणार असल्याच्या भीतीने भाजपाला पोटशूळ उठला म्हणून दिशाभूल करणारी माहिती काही सुपारीबाज पत्रकार पसरवत आहेत, असा पलटवार काँग्रेस …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा गोप्यस्फोट, आरएसएसने सरदार पटेलांच्या त्या तीन अटी… संविधान निर्धार सभेतून वैदिक धर्मावर हल्ला !
एका बाजूला इथे वैदिक परंपरा आहे ती विषमतावादी आहे आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा आहे ती बंधू भावाची असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले. यावेळी, डॉ. बाबा आढाव, आमदार शिरिष चौधरी, आमदार कपिल …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, इस्राईल-पॅलेस्टाईन युध्दामुळे चुकीची माहिती पसरतेय
मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात युध्द सुरु आहे. मात्र या दोन देशांमध्ये फक्त युध्द असल्याचे समजून कोणीही शांत राहू नये. परंतु हे युध्द सुरु राहिल्याने अनेक चुकीची माहिती पसरत असून या दोन देशातील युध्द थांबविण्यासाठी केंद्रातील भारत सरकारने पुढाकार घेऊन आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा मनोज जरांगेना सल्ला, जी चूक सोनिया गांधींनी केली ती करू नका
२००९ साली गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार येणार होते. पण त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्यांच्या सल्लागारांनी एका चुकीचे भाषांतर केलेल्या हिंदी वाक्य वापरायला लावले. त्या शब्दामुळे काँग्रेसची सत्ता आली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझे सांगणे आहे की, त्यांच्या सल्लागाराचा शब्द ऐकू नये नाही तर त्यांचा प्रश्न सुटणारच नाही …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, ओबीसीच्या नेत्यांनी माझ्या नादीला लागू नये…
आजच्या संविधान महासम्मान रॅलीच्या निमित्ताने काही हौशींनी सांगितले की, तुम्ही ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर बोला. तुम्ही मंडलच्या बाजूने की, कमडंलूच्या बाजूचे असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर मी आताच ओबीसी नेते छगन भुजबळ असो नाही तर प्रकाश शेंडगे यांना मी आत्ताच सांगतो की, माझ्या नादीला लागू नका. कारण तुम्ही ओबीसी …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, संविधान जगातील पवित्र ग्रंथ, पण तोच बदलण्याची भाजपाची भाषा…
देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला, पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात. संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे. …
Read More »‘वंचित’ची २५ नोव्हेंबरच्या महासभेला राहुल गांधी यांना आमंत्रण
भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून येत्या २५ नोव्हेंबर रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी याना देण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली. बॅलार्ड पिअर्स येथील वंचितच्या राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर …
Read More »
Marathi e-Batmya