Tag Archives: भाजपा

मराठा समाजाला मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी पोलीसांकरवी लाठ्या काठ्यांनी मारले मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा :- नाना पटोले

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी वर्तविली शक्यता,… छापे- अटकेसाठी तयार रहा इंडिया बैठकीत काँग्रेसचा आवाहन

मुंबईत सुरु असलेल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना सत्ताधारी पक्षाच्या विरोधात इशारा देताना म्हणाले, आमच्या दोन्ही सभांचे यश, पहिली पाटणा आणि दुसरी बंगळुरू, यावरून मोजता येईल की, पंतप्रधानांनी त्यांच्या त्यानंतरच्या भाषणात केवळ इंडिया आघाडीवर हल्लाच केला नाही तर आपल्या …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती , ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेला मूर्त स्वरूप देण्याची वेळ महायुतीच्या कार्यक्रमात अजित पवार यांचा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील …

Read More »

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान लोकसहभागातून यशस्वी करावं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेने या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कुलाबा येथील कार्यक्रमात या अभियानाचा राज्यव्यापी प्रारंभ करण्यात आला …

Read More »

राजनाथ सिंग यांची टीका, इंडिया म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे…. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान

भाजपाचे वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील डॉ विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावे देण्यात येत असलेल्या साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाषण करताना मुंबईत विरोधाच्या होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, १ मिलियन पैसा कोणाचा, चिनी व्यक्तीची गुंतवणूक भारतात कशी ? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या इंडिया या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी हे मुंबईत आले होते. त्यावेळी बांद्रा येथील ग्रॅड ह्यात हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन वर्तमानपत्रांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती …

Read More »

शरद पवार यांचे आव्हान, पंतप्रधानांनी नुसतेच आरोप करण्याला काय अर्थ… अजित पवार सोडून गेलेल्यावर केले भाष्य

आज इंडियाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठकीशी संबधित चर्चेची रूपरेखा आणि तयारीची माहिती देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी वाट धरल्यावरून अद्यापही संशय असल्याचा …

Read More »

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या एक खिडकी योजनेस मंजुरीसाठीचा शासन आदेश जारी सर्व परवानग्या प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ३ महिन्यात पूर्ण करणे मुंबई प्रदेश क्षेत्राकरिता नोडल एजन्सी म्हणून मुंबई बँक घोषित

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देऊन त्याबाबतच्या प्रस्तावावर तीन महिन्यात प्रक्रिया होईल. त्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत केली होती. त्यानुसार आज राज्यातील …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

इंडियाच्या धर्तीवर भाजपासह एनडीएची बैठक मुंबईत होणार

भारतीय जनता पार्टी , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची संयुक्त बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती महायुतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि भाजपा आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, …

Read More »