काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बीडीडीकरांना मिळालेली घरे मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ
मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माटुंगा येथील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला, २०२४-१९ आणि २४ ला भाजपाच मोठा…पण… मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दाव्यावरून लगावला टोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीच्या आसपास केव्हाही जाहिर होणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा, मनसेकडून सातत्याने पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका घेण्याचा सपाटा सुरु आहे. तर दुसऱ्याबाजूला सत्ताधारी पक्षांकडूनही बैठकांचे सत्र सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे …
Read More »भाजपाचा अजेंडा गणेशोस्तवात राबविण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंडळांना आवाहन ऑपरेशन सिंदूर चे देखावे सादर करण्याचे केले आवाहन
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरीक ठार झाले. या अतिरेकी हल्ल्याला प्रतित्युर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरतंर्गत कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांना उद्धवस्तही केले. मात्र भारतीय सैन्याकडून कारवाई सुरु असतानाच अचानक भारताने पाकिस्तानबरोबर युद्धबंदी केली. परंतु या युद्धबंदीची घोषणा सर्वात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड …
Read More »शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात सोमवारी, १८ ऑगस्टला तलवार मुंबईत दाखल होणार
नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी १८ ऑगस्ट २०२५ रोजी ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. ऐतिहासिक दस्तऐवज असलेली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, रेल्वे बोगी कारखान्यात स्थानिकांना प्राधान्य द्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार
लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका ‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत
काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी ‘गरुड दृष्टी’ हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर पोलीस विभागाच्या वतीने …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आता नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मोहन मते, कृष्णा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी घेतली बहिणींच्या रक्षणाची शपथ महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये 'बचत गट मॉल्स'
महिला सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा कणा असतो. ज्यावेळी समाजातील महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच त्या राष्ट्रांच्या विकासाला गती येते. महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे सांगून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल, शरद पवार यांना राहुल गांधी यांची आठवण कशी? शरद पवार यांच्या दाव्यावर सलिम-जावेदची स्टोरी असल्याची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अॅटम बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा करत लोकसभा आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूकीत मतचोरी भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केला असल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या आधी दोन व्यक्ती भेटायला आल्याचे आणि १६० जागा …
Read More »
Marathi e-Batmya