Tag Archives: राज्यघटना

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच

देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या ‘डरो मत’ संदेश अंमलात आणू, …

Read More »

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव” सहा हजार महाविद्यालयांमध्ये राबविणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या …

Read More »

राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ व्यापक जनसंपर्क अभियान

भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून …

Read More »

राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांना अभिवादन तर घटनेच्या शिल्पकाराकडे पाठ

मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …

Read More »

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे असा उपरोधिक टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. पुढे बोलताना भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, …. लढाईत सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची

देशात मागील १० वर्षापासून अत्याचारी, जुलमी, हुकूमशाही पद्धतीने काम केले जात आहे. भाजपाचे सरकार हे जनतेच्या मुलभूत प्रश्नांनाही महत्व देत नाही. संविधानिक व्यवस्था मोडीत काढून मनमानी कारभार सुरु आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवले जात आहे. देशासमोर आज मोठे आव्हान असून याचा मुकाबला करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान व्यवस्था अबाधित …

Read More »

राज्यघटनेतील तरतूदीनुसार विधिमंडळाची रचना व कार्ये, कार्यपध्दती नेमकी काय

संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी …

Read More »

नाना पटोले यांची टीका, संविधान आणि लोकशाहीला धाब्यावर बसवून… पत्रकारांचा अवमान करणा-या चंद्रशेखर बावनखुळे आणि भाजपने माफी मागावी

२०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे व चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, विवेक देबरॉय व रंजन गोगोईंच्या विधानांशी नरेंद्र मोदी सहमत आहेत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज विचारांचे म्हणून अपमान करणाऱ्यांचा राजीमाना घ्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस व भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त …

Read More »