Tag Archives: agriculture minister

अजित पवार यांची माहिती, शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना

महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल, असे …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्याचे कृषीमंत्री …

Read More »

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने मदत करणार

राज्यात ९ ऑगस्टपासून आजपर्यंत १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात ८ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …

Read More »

वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट इशारा… मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करणार मग निर्णय घेणार

कृषी खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर नवे नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पद स्विकारल्यापासून काही ना काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनत …

Read More »

माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खुलासा, रूपया शेतकरी देत, मग भिकारी कोण… मी कोर्टात खेचणार शेतकऱ्यांकडून सरकार रूपया घेतं मग भिकारी कोणं

दोन दिवसांखाली लातूरमध्ये महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद होती. परंतु त्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओचा निषेध छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे राजकिय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिनाचे …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीत मग्न, टीकेचा भडिमार नव्या वादाला माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा तोंड फोडले

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर …

Read More »

माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ

मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून, उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. …

Read More »

माणिकराव कोकाटे यांची माहिती, शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविणार शासन ठोस पावले उचलणार

शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. कमी मनुष्यबळात काम करणे, मानवविरहित यंत्राचा वापर करणे, कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन विविध कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवत आहे शासन शेतक-यांच्या हितासाठी आलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावरती कार्यवाही करेल असे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी …

Read More »

अजित पवार यांची म्हणाले, शेती ही संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ …

Read More »