राज्यातील शेतकऱ्यांना सध्या जोड खतांची खरेदी करावी लागत आहे. मात्र यातील खतांची ऑनलाईन नोंदणी झाल्याशिवाय दुसरे घेता येत नाही. त्यामुळे या जोड खतांमागे व्यापारी, दुकानदार यांचे काही लागेबांधे आहेत असा सवाल करत खत विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी …
Read More »जोड खतांचे गौडबंगल बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभागृहात उघड कृषीमंत्र्यांकडून आश्वासन; कंपन्यांना समज देणार
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, मात्र खते खरेदी करताना शेतकरी बांधवांना खतांच्या सोबत जोड खते खरेदी करावी लागत आहे. मात्र यामध्ये खाजगी सरकारी आणि सहकारी कंपन्यांकडूनच विक्रेत्यांना मुख्य खताबरोबर जोड खते सक्तीने दिली जात आहेत, शेतकरी आणि संस्था वाचवण्यासाठी सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, कृषीकर्ज व बियाणांसंदर्भात राज्य सरकारकडून चुकीची माहिती कृषी मंत्र्यांच्या नावाने वसुली करणाऱ्यांवर काय कारवाई केली?
राज्यातील भाजपाप्रणित ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर देत असून …
Read More »बियाणे-खते-खरीप पीक कर्जप्रश्नावरून काँग्रेसने मंत्री मुंडे यांना घेरत केला सभात्याग अखेर अर्थमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करत दिले उत्तर
विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तास पुकारण्यात आला. यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात येत असल्याची प्रश्न काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस सदस्यांच्या प्रश्नासमोर मंत्री धनंजय मुंडे यांना …
Read More »नाना पटोले म्हणाले, वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तार… स्विय सहायक दिपक गवळी प्रकऱणावरून काँग्रेसने केली मागणी
अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री …
Read More »मुख्यमंत्री कार्यालयात आले मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, फाईल पाठवायचीय इथेच इनव्हर्ड करतात का? सोबत कार्यकर्त्यांना घेऊन टेबल टू टेबल फिरत राहिले
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गतीमान सरकार-वेगवान निर्णयचा नारा देत राज्य सरकार किती गतीमान काम करत आहे, याचे दाखले प्रसिध्द करण्याचा प्रयत्न नेहमीच सरकार पातळीवरून करण्यात येत आहे. मात्र आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दुपारी तीन च्या सुमारास …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा
शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली, …
Read More »शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासोबतच्या बैठकीनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. …
Read More »अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधा कृषी मंत्री अब्दुल सत्तार पोहोचले धुळे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे पाहणीसाठी पोहचले
मागील आठवडाभरात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपल्याने हाता तोंडाशी आलेली पिके हातची निघुन गेली. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकल्याचे चित्र दिसू लागले. याप्रश्नी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठविला. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत …
Read More »अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या चिखलातः जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना बसला फटका निसर्ग कोपलाः गारपीठाचा मारा, शेतकरी झाला हवालदिल
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या …
Read More »
Marathi e-Batmya