Tag Archives: ajit pawar

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. केंद्र सरकारने १ …

Read More »

या ३५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले दोन महिन्यांचे अर्थसहाय्य सामाजिक न्याय विभागांतर्गत सव्वा चौदाशे कोटी रुपये निधी वितरित- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या अनुषंगाने कडक निर्बंधांच्या काळात गरीब जनतेला दिलासा मिळावा या हेतूने राज्य सरकारने यापूर्वीच विशेष पॅकेज घोषित केले आहे. यामधून सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील ३५ लाख लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांचे प्रतिमहिना एक हजार रुपये …

Read More »

अजित पवारांचे आदेश, आर्थिक पॅकेजमधील लाभार्थ्यांना मदत निधी वाटप करा निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ …

Read More »

राज्यातील किराणा दुकाने आता सकाळी ७ ते ११ पर्यंतच खुली राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ऑक्सिजन, रेमडीसीवीर उपलब्धतेबाबत महत्वाची बैठक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कडक निर्बंध लागू करूनही जनता किराणा दुकानाच्या नावाखाली रस्त्यावर बाहेर फिरत आहे. तसेच गर्दीही करत आहे. त्यामुळे आता किराणा दुकाने उघडी ठेवण्यावर निर्बंध आणण्यात आले असून राज्यातील सर्व किराणा दुकाने आता सकाळी ७ ते  सकाळी ११ वाजण्याच्या कालावधीत सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

Read More »

सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे संकेत कडक निर्बंधाशिवाय दुसरा पर्याय राहीला नाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या …

Read More »

घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला मविआ सरकारने दिला दिलासा २०२१-२२ वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही -बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरापासून यंदाही कोरोना संकटाचा मुकाबला राज्यातील जनता करत आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक समस्येचा सामना सर्वसामान्य नागरीकांबरोबरच सरकारलाही करावा लागत असल्याने यंदाच्यावर्षीही रेडी रेकनरच्या दरात कोणतीही दर वाढ न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेत राज्यातील घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला दिलासा दिल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. …

Read More »

वेतन वाढ करा, आमदारांच्या स्वीय सहायकांचे विधानसभेच्या उपाध्यक्षांना साकडे मागणीची दखल घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी पाठविली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता स्वीय सहायकांनीही आपल्या वेतन वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या केल्या. या मागणीसाठी सर्व आमदारांच्या स्वीय सहायकांनी थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून …

Read More »

आम्ही राज्यपालांना भेटणार मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील नेते भेटणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून महाराष्ट्राची बदनामी करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळ देण्याबाबतची विचारणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र आज राज्यपाल मुंबईबाहेर आहेत. मात्र ते जर संध्याकाळी परत आले तर त्यांची आज संध्याकाळी भेट …

Read More »

राज्य सरकारमुळे म्हाडा बनली दात व नखे काढलेला वाघ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ८ कलमी अधिकाराचे विभागाला पत्र

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाची स्थापना केली. तसेच म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी यापूर्वीच्या सरकारांनी म्हाडाला स्वायत्त बनविण्यासाठी अनेक अधिकार दिले. मात्र आता महाविकास आघाडी सरकारला म्हाडाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी यासाठी म्हाडाचे जवळपास सर्वच महत्वाचे …

Read More »

राणेंचा प्रहार, अर्थसंकल्पावरून अजित पवारांवर केली ही टीका आकड्यांचा खेळ आणि फक्त वायदे

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचा २०२१-२२ सालचा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची फसवणूक करणारा, आकड्यांची हेराफेरी करणारा आहे अशी टीका भाजपा  नेते खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले की, राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची ‘हेराफेरी’ आहे. राज्याच्या उत्पन्नात गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ५४ हजार कोटी …

Read More »