Tag Archives: ashok chavan

सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी भाजप शिवसेना सरकारच्या दिरंगाईमुळे मराठा आरक्षणासाठी आधीच जवळपास चार वर्ष दिरंगाई झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई पूर्ण करून ओबीसी सहित इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता न्यायालयात टिकेल असे  १६ टक्के आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक …

Read More »

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …

Read More »

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाची नांदेडमधून सुरुवात जनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचे चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी  खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर …

Read More »

नोटबंदीची दोन वर्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा दोन वर्षातील घोषणा आणि त्यातील फोलपणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी लिहिलेला लेख

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १००० रूपयांच्याचलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते ‘एक कागज का तुकडा’ होणार आहेत. लक्ष्मीपूजन होणाऱ्या ह्या देशात ही  भाषा कितपत योग्य आहे हा तर मुद्दा आहेच, मात्र दोन वर्षांनंतर ह्या धमकी …

Read More »

तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

औसा : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि …

Read More »

जलयुक्त शिवार राज्यातला सर्वात मोठा घोटाळा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे असे सांगून जनतेची फसवणूक करत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य नाही …

Read More »

काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खून लोकशाहीचा खून केल्याचा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई ः प्रतिनिधी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून ही काँग्रेस कार्यकर्त्यांची नाही तर लोकशाहीची हत्या आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस …

Read More »

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सरकारला सवाल

शहादाः प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. तीव्र पाणीटंचाई आहे. तरीही सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस …

Read More »

महागाईच्या विरोधात विरोधक उतरले रस्त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह ठाकरे, निरूपम यांना अटक

मुंबई : प्रतिनिधी वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अंधेरी येथील रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु केले. यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून …

Read More »