विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, हरियाणातील निकाल हा लोकशाहीचा पराभव महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, परिस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येणार लाडकी बहिण योजना केवळ निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी
हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता तयार आहे. राज्यातील जनतेचे समर्थन महाविकास आघाडीला मिळून मविआचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त …
Read More »निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, दुसरी सलामी महाराष्ट्राची देणार हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार-चंद्रशेखर बावनकुळे
हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयाबाहेर आज विजयी मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत मिठाई वाटण्यात आले. हरियाणात अपेक्षा नसतानाही भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी ठरली. मात्र हरियाणातील भाजपाचा फॉम्युला जम्मू आणि काश्मीर राज्यात यशस्वी ठरू …
Read More »तेलंगणा राज्यातील निवडणूक निकालः राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणारा
तेलंगणातील निकाल हीच एक गोष्ट आहे जी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आली आहे. तीन हिंदी-हृदय प्रदेशातील भाजपा विरुद्ध काँग्रेस या लढतीवर ‘राष्ट्रीय’ माध्यमांचे लक्ष केंद्रित असताना, या दक्षिणेकडील राज्यातील बहुकोणीय लढतीतून स्पष्ट निकाल येऊ शकतो. त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही मोठा परिणाम होईल. सुमारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत तेलंगणात काँग्रेसची कोंडी झाली होती. …
Read More »चार राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या मतांची टक्केवारी किती? जाणून घ्या कोणत्या कारणामुळे भाजपाचा मतदार वाढतोय? तर काँग्रेसचा का घटतोय
लोकसभा निवडणूकांना आता तसे पाह्यला गेले तर तीन ते चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र लोकसभेची निवडणूक आचारसहिंता लागू होण्यापूर्वीच देशातील ईशान्य भारतातील मिझोरम, दक्षिण भारतातील तेलंगणा, आणि उत्तर भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील विधानसभांचा कार्यकाल संपत येतो. त्यामुळे या राज्यातील निवडणूका घेणे राज्यघटनेतील तरतूदीनुसार केंद्रीय …
Read More »पराभवानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, वैचारिक लढा सुरुच…
देशातील पाचपैकी चार राज्यातील निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. छत्तीसगड, राजस्थान बरोबर मध्य प्रदेश मध्येही काँग्रेसला कौल मिळेल अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनही भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित करत चांगलेच कोंडीत पकडत होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत एक …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास,… निकालांचा परिणाम होणार नाही, इंडिया आघाडी मजबूत
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला …
Read More »“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले
लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा …
Read More »
Marathi e-Batmya