मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार
देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …
Read More »भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपावर काँग्रेस, शिवसेना उबाठाची टीका भारत पाक सामन्याला परवानगी दिलीच कशी
रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप टी-२० स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संबंधित क्रिकेट संघ एकमेकांशी सामना करण्याची तयारी करत असताना, भारतात राजकीय तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यांतच मेन इन ब्लूला त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना करण्याची परवानगी दिल्याबद्दल अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये २५ …
Read More »माजी आयुक्त एस वाय कुरैशी म्हणाले, आयोगाने राहुल गांधी यांना बोल लावण्याऐवजी चौकशी करावी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका
भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) “मतचोरीच्या” आरोपांवर दिलेल्या उत्तराबद्दल कठोर टीका करताना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) म्हटले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर “आक्षेपार्ह आणि टीपण्णी” भाषेत “बोलणे” करण्याऐवजी त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, एस …
Read More »केंद्राच्या नव्या वक्फ बोर्ड कायद्यावर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबरला निर्णय देणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) निकाल देणार आहे. या याचिकेचे वर्णन १०० हून अधिक याचिकाकर्त्यांनी मुस्लिम मालमत्तेचे “जोरजोरात अधिग्रहण” असे केले होते तर सरकारने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवरील “अतिक्रमण” विरुद्ध आवश्यक प्रतिकार म्हणून बचाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.
काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …
Read More »
Marathi e-Batmya