Tag Archives: loan waiver

उद्धव ठाकरे यांचा उपरोधिक टोला, शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवले मतदार यादीतील घोळ दूर करा आणि नंतर निवडणुका घ्या

मी शेलार यांच्यावर बोलत नाही. पण आज त्यांचं खास अभिनंदन आणि कौतुक करतो. की त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदार हे वाचून दाखवले. मग दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची बाजू घेत आहेत. आणि बोगस मतदान झाले नाही अस म्हणत आहेत. त्यालाच एक प्रकारे शेलार यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!

कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे, त्यात संवदेना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार; अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारुन वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील काय? असा सवाल शिवसेना …

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. समिती शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा, सर्वसामन्यांच्या घरांकडे मात्र दुर्लक्ष

मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमाफीवरील भाजपाच्या नेत्यांची विधाने जखमेवर मीठ चोळणारी

राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, फडणवीस, शिंदे, पवार ……महागात पडेल कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी …

Read More »

माणिकराव कोकाटे यांचा अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशांन काय करता? साखरपुडा, लग्न… शेतकऱ्यांनं कर्जमाफी बाबत विचारणा केल्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांच उत्तर

राज्यातील लाडकी बहिण योजनेतंर्गत १५०० चे २१०० रूपये देणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार या दोन आश्वासने महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात दिली होती. मात्र राज्यात सरकार स्थानापन्न होऊन चार महिने झाले तरी लाडक्या बहिणींचे १५०० चे २१०० रूपये आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन गोष्टी काही अद्याप सत्यात उतरल्या नाहीत. त्यातच …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारडे पैसे, पण शेतकऱ्यांसाठी नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा

राज्यातील शेतकऱ्याला अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला लागणारे बि-बियाणे, खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेली आहेत, कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्यच आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी सोडा नवे कर्जही नाही न्यायालयाच्या निकालाचा राज्य सरकारकडून अवमान

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारने कोल्हापूरातील ४४ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवित कर्जमाफी देण्यास नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्ज माफीचा निर्णय प्रलंबित ठेवत चालू वर्षासाठी पीक कर्ज देण्याचे आदेश दिले. मात्र त्यावर २०१८ सालापासून राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही …

Read More »

राहुल गांधी म्हणाले,… यही नियत और आदत भी तेलंगणातील शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतच कर्ज माफ

लोकसभा निवडणूकीपूर्वी तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेलंगणातील रेवंत रेड्डी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आज पूर्तता करत शेतकऱ्यांचे दोन लाख रूपयांपर्यंतचे ३१ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहिर केला. यासंदर्भात रेवंत रेड्डी यांनी आज राज्य …

Read More »