Tag Archives: loksabha election

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »

निवडणूकीच्या निकालाने तीनच दिवसात या शहरातील बांधकाम क्षेत्रातील किंमतीत वाढ किंमतीत १०० टक्क्याने वाढ

निवडणुकीच्या निकालांनी भारतातील शेअर बाजारावर कसा प्रभाव टाकला, काही तासांतच लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकदारांची संपत्ती जोडली किंवा नष्ट केली हे आपण यापूर्वी पाहिले आहे. यावेळी, ४ जून रोजी, लोकसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू असताना, भारतीय शेअर बाजार घसरला आणि गुंतवणूकदारांच्या २० लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती नष्ट झाली. तथापि, तेव्हापासून, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, मी पळणार नाही तर लढणारा विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, आणि तुम्हीही थांबू नका असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत हा देवेंद्र फडणवीस पळणारा नाहीतर लढणारा असल्याची स्पष्टोक्ती भाजपा आमदारांच्या बैठकीत बोलताना दिली. भाजपा आमदारांच्या …

Read More »

या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा मदतगार ठरणार?

लोकसभा निवडणूकीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यकर्त्यांच्या संमेलनात अब की बार ४०० पार चा नारा दिला. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ये काँग्रेस की गॅरंटी या शब्दाची नकल करत भाजपा सरकारऐवजी मोदी सरकार की गॅरंटी हा शब्दप्रयोगही राजकारणात आणला. मात्र मोदी …

Read More »

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. २०१४ मध्ये या तिसऱ्या …

Read More »

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला उमेदवारी दिली जाईल. सोबतच …

Read More »

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूकीची पार पडणार आहे. त्याचबरोबर या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज …

Read More »

या बचत योजनांवरील व्याज दर तीन महिन्यांसाठी जैसे थे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांचा कालावधी सुरु आहे. देशातील निवडणूका या सात टप्प्यात होत असून यात जवळपास तीन महिने हा निवडणूकीचा हंगाम असाच सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय जाहिर केला आहे. केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांवरील एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यासारख्या …

Read More »

काँग्रेसची ५७ जणांची तिसरी यादी जाहिरः महाराष्ट्रातील ७ जणांना उमेदवारी बँक खाती सील केल्यानंतर संध्याकाळी उशीरा काँग्रेसने जारी केली यादी

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या उधळलेल्या वारूला रोखण्यासाठी आस्ते कदमचा आणि सावध पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाने आतापर्यंत तीन लोकसभा उमेदवारांच्या याद्या प्रसिध्द केल्या. परंतु तिसऱ्या यादीतील अनेक वादग्रस्त उमेदवारांना नारळही दिला तर काही उमेदवारांनी दिलेले उमेदवारीचे तिकिट नाकारत निवडणूकीच्या रणागंणापासून दूर राहणेच पसंत केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने …

Read More »