Tag Archives: mumbai

येत्या २४ तासात मुंबईसह या ठिकाणी कोसळणार अति अति मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास …

Read More »

सार्वजनिक उत्सवावर नऊ तपासणी पथकांची राहणार नजर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पथकांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील. त्या अनुषंगाने उभारण्यात येणऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे. उच्च …

Read More »

गणेशोत्सवासाठीची कोंकण रेल्वेची पहिली रेल्वे उद्या धावणार उद्यापासून बुकींग आणि गाडी धावणार

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सव काळात मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यास अखेर यश आले असून १५ ऑगस्ट २०२० पासून कोकणात जावू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर २०० गाड्या धावणार असल्याची माहिती कोकण आणि मध्य रेल्वेने एका प्रसिध्दी पत्रकान्वये आज जाहीर …

Read More »

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी …

Read More »

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं ही तर चाकरमान्यांची फसवणूक- भाजपा नेते अँड आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …

Read More »

मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. यापूर्वीच ३ ते …

Read More »

पावसाळी साथ आजाराचा मुकाबला करत कोरोनाचे ट्रॅकींग- टेस्टींग ही वाढवा यंत्रणांनी समन्वयातून काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाळ्यातील आपत्तीला सामोरे जातानाच कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. मुंबईमध्ये याकाळात क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे …

Read More »

मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील …

Read More »

पावसाळी अधिवेशन दिड महिन्यानंतर, मात्र १ दिवसीय होवू शकते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनला होणार होते. मात्र मुंबईसह राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. हे अधिवेशन किती चालेला याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत पुरवणी मागण्यांसाठी एक दिवसाचे अधिवेशन होवू शकते अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. रायगड …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »