Tag Archives: narendra modi

उद्या पंतप्रधान मोदींचा दौरा, पण नाराज राज्यपाल कोश्यारींची कार्यक्रमाकडे पाठ राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करूनही अद्याप आदेश आला नसल्याने राज्यपालांचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठविली. यापार्श्वभूमीवर सातत्याने साधारणतः महिनाभरापूर्वी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची विनंती केली होती. याबाबतची अधिकृत माहिती राजभवनाकडून जारी करण्यात आली होती. त्यानंतर …

Read More »

अद्यापही पंतप्रधान मोदींना भीती कोरोनाची कोरोना चाचणी नसेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या जवळपासही भटकू शकत नाही-एसपीजीचे तोंडी आदेश

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारलेल्या चुकीच्या धोरणावर अद्यापही टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चुकिच्या धोरणावर आतापर्यंत तरी पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारने, भाजपाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र ज्या काळात कोरोना संक्रमणाच्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट मोदींना सवाल, अदानी प्रकरणावर चर्चा का नको? अदानी मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी हे सरकार जोरदार प्रयत्न करतेय

गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक होऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, संसदेत गौतम अदानी प्रकरणावर नरेंद्र मोदींना चर्चा नको आहे. परंतु देशाला समजलं पाहिजे की, अदानीच्या मागे कोणती शक्ती ठामपणे उभी …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, मोदी सरकार अदानी समुहातील गैरकारभाराच्या चौकशीला का घाबरते ? जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’ चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. खा. राहुल गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुल यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी करोडो …

Read More »

सामान्य जनतेची गुंतवणूक अदानीच्या खिशात घालणाऱ्या मोदी सरकारविरोधात एल्गार प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI जनतेचा पैसा बुडण्याची भिती सोमवारी ६ तारखेला राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. …

Read More »

अदानीप्रकरणावर अर्थमंत्री सीतारामण म्हणाल्या, भारताची आर्थिक स्थिती उत्तम हिंडेनबर्ग आणि अदानी वादावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया

२०१४ साली देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार आल्यापासून केंद्र सरकारच्या मालकीच्या एकूण संस्थांपैकी जवळपास ६० टक्के संस्था एकट्या अदानी उद्योग समुहाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसेच देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी ६० टक्के पैसा कर्ज स्वरूपात भारतीय बँकानी अदानी समुहाला दिल्याची माहिती पुढे येत असतानाच अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले ? CM, DyCm नी केंद्राला विचारावा , शेजारच्या राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही

या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारे बजेट

गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. देशाच्या आणि …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, ‘अमृत काळ’चे वेस्टन लावून मूळ प्रश्नांना बगल देणारा अर्थसंकल्प’ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प

लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. …

Read More »