शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर मुंबईतील विविध विकास कामांच्या शुमारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नसतो असे मोठे विधान केले. या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, यांचा डोळा मुंबई महापालिकेने विकास कामे करून …
Read More »उध्दव ठाकरेंनी दिले शिंदे गटाला आव्हान,.. मैदानात उतरा, कोण जिंकतो ते बघुया आयोगाच्या निर्णयानंतर सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर केली गर्दी
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला. आज दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर …
Read More »नाना पटोलेंचा खोचक सवाल, देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा …
Read More »निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाने शेण खाल्ल, मग इतका खटाटोप कशासाठी? मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून जाहिरच करावं
एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका …
Read More »गोध्रा दंगलप्रकरणी मोदींच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बीबीसीवर छापेमारी दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाने केली कारवाई
गुजरातच्या मुख्यमंत्री पदी नरेंद्र मोदी असताना २००२ साली गोध्राकांड घडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक डॉक्युमेंटरी “इंडिया- द मोदी क्वेश्चन” ही काही दिवसांपूर्वी बीबीसी या वृत्तवाहीनीने प्रसारीत केली. त्यावेळी बीबीसीने प्रसारीत केलेली ही डॉक्टमेंटरी सोशल नेटवर्कींग साईटसवरून काढून टाकाली असे निर्देश केंद्र …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, भारतीयांना हिंदूत्व म्हणजे काय ? याचे उत्तर हवेय केवळ एकमेकांचा द्वेष म्हणजे हिंदूत्व नव्हे
भाषा कुठलीही असो मनं मिळायला हवीत. जो संवाद होतो तो ह्दयातून असायला हवा. मन मिळाली की मार्ग स्पष्ट होतो. मी आता हिंदीतून बोलातोय, पण मला खात्री आहे माझ्या हिंदी पेक्षा तुमची मराठी अधिक उत्तम असेल. पिढ्या न पिढ्या तुम्ही इथे आहात. हा मेळावा नव्हे बैठक. मेळाव्यासाठी मैदान अपुरे पडेल. परिचयाची …
Read More »काँग्रेसची टीका, राजीनामा मंजूर करून केंद्राने कोश्यारींचा सन्मान केला तर महाराष्ट्राचा अवमान कोश्यारींच्या पापाची फळे भाजपाला भोगावी लागतील
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली …
Read More »राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला निर्णय हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत अनादर व्यक्त करणारे वक्तव्य करत मराठी जनतेची मने दुखावणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र भाजपाला पोषक अशी भूमिका राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून घेण्यात येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री …
Read More »पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यानंतरच राज्यपाल कोश्यारी पदमुक्त फक्त स्वागत आणि निरोपाला हजर रहात आपली नाराजी पहिल्यांदाच दाखविली
काही दिवसांपूर्वी राज्याच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यानंतरही पंतप्रधानांनी त्यांच्या इच्छेनुसार पदमुक्त केले नसल्याने वीस दिवसाच्या अंतराने मुंबईत दुसऱ्यांदा आलेल्या पंतप्रधान मोदीसोबत कार्यक्रमाला हजर राहण्यास असमर्थता दाखवित पहिल्यांदाच आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर लगेच एक दिवसाच्या …
Read More »वाचा, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे काय खास, कोणत्या सुविधा आहेत यात? फडणवीस म्हणाले, रेल्वे आधुनिकीकरण- विस्तारीकरणासाठी पंतप्रधानांचे योगदान महत्वपूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि …
Read More »
Marathi e-Batmya