Tag Archives: nashik

उध्दव ठाकरेंच्या सभे आधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर

जानेवारी महिन्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहिर सभा होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसेच सध्या नाशिकच्या दौऱ्यावर संजय राऊत आहेत. मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला. यापूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश शिंदे गटात प्रवेश …

Read More »

मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना दिली मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक …

Read More »

नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे …

Read More »

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बालसाहित्य मेळाव्याची परंपरा यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनातही सुरू राहील - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम मराठी साहित्य संमेलनाच्या याआधीच्या ९३ संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहे. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या इतिहासात बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला. बालसाहित्य मेळाव्याची ही …

Read More »

राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …

Read More »

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री …

Read More »

या तारखेपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबईः प्रतिनिधी ११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, किराणा, औषधांच्या गाड्या सोडाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एमएमआरमधील नागरीकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असली तरी यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली. तसेच शहरातील रस्त्यांवर गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक सोसायटीत राहणाऱ्या नागरीकांच्या भाजीपाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. या भाजीपाल्याबरोबरच जर राज्य सरकारने प्रत्येक सोसायटीत, झोपडपट्टीभागात किराणा माल आणि …

Read More »