मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिंदे समितीच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हैद्राबाद गॅझेटिअर आणि सातारा संस्थानच्या गॅझेटिअर वापरल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे हे दोन्ही गॅझेटचा संदर्भ वापरावा अशी मागणी मनोज जरांगे …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेला सत्तेचा माज साईभक्तांना मोफत प्रसाद लाखो भक्तांच्या दानाच्या पैशातून; सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही
शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने …
Read More »पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीतील विसंगती दूर करणार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोल्ट्री शेडसाठी ग्रामपंचायतींमार्फत कर आकारणीमध्ये विसंगती दूर करून दिलासा देण्यात येईल. हा कृषी क्षेत्रातील व्यवसाय असून त्यानुसार ठराविक एकसमान दराने कर आकारण्यासाठी कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. कुक्कुट पालकांच्या विविध मागण्याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधाला ३५ रुपयांचा भाव मंत्री विखे पाटील यांनी सभागृहात केली घोषणा
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर एकूण ३५ रुपये दर देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने मंगळवारी विधानसभा सभागृहात घेतल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, यात दुधाला प्रतिलिटर ३० रु. स्थायीभाव तर शासनाकडून ५ रु. अनुदान देण्यात येणार …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?
राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आली आहे यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …लुट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार का?
ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे …
Read More »महाराष्ट्र बोव्हाइन ब्रीडिंग अधिनियम करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यातील शेतकरी आणि पशुपालक यांच्यासह एकूणच जनतेच्या सर्वांगीण हिताचा निर्णय घेत राज्य शासनाने पशुउत्पादकत्ता व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे. गाय व म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाकरिता गोठीत वीर्य निर्मिती, प्रक्रिया, साठवण, विक्री, वितरण आणि प्रत्यक्ष कृत्रिम रेतन करणे, तसेच सहाय्यक पुनरुत्पादक तंत्र आणि या संबंधित सर्व बाबींसाठीचे नियमन …
Read More »कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार
कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध …
Read More »धनगर आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांवर भंडाऱ्याची उधळण भंडाऱ्याची उधळण झाल्याचा आनंदच- विखे पाटील यांची संयमाची भूमिका
मराठा समाजाला कुणबी समाजाचे आरक्षण देण्याचा मुद्दा गाजत असतानाच राज्याचे महसूलमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज सोलपुरात धनगर समाजाच्या आरक्षणावरून या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. धनगर समाजाच्या कार्यकर्त्याने विखे पाटील यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने त्यांच्या अंगावर भंडारा टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सुरक्षा यंत्रणेत …
Read More »गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण …
Read More »
Marathi e-Batmya