Tag Archives: RSS-rashtriya swayanksevak sangh

एकनाथ शिंदे यांचे मत, आरएसएसवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने संविधान व गांधी विचार स्विकारावा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला हवाय वैचारिकतेवर आधारीत काम करणारा भाजपाचा अध्यक्ष भाजपाच्या नव्या अध्यक्षाकडून आरएसएसच्या आशा

भाजपाने आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी आवश्यक कोरम पूर्ण केला आहे. पक्षाची वैचारिक पालक संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सोबत चर्चा झाली आहे. संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपा नेतृत्वाला भर दिला आहे की त्यांच्या अध्यक्षाची नियुक्ती ही नियमित संघटनात्मक प्रक्रिया नाही तर पक्षाचे पुनर्संचयित करण्याची संधी आहे. बॅकचॅनल चर्चेत, संघाच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसचे पराभूत करू शकतो गुजरात विरोधकांसाठी महत्वाचे राज्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ एप्रिल २०२५) म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, केवळ त्यांचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपाला पराभूत करू शकतो. एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिमेकडील राज्यात जवळजवळ ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या आरएसएस …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, एनडीएचे धोरण तुष्टीकरणाचे नाही तर संतुष्टीकरणाचे भारतरत्न सन्मान नाकारणाऱ्यांना आता जबरदस्तीने जय भिम म्हणावे लागतेय

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज येथील गंगा नंदीत डुबकी लगावली. मात्र त्याचवेळी अवैधरित्या अमेरिकेत घुसखोरी कऱणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकी प्रशासनाने काल अमृतसर येथे हातापायात बेड्या घालून एखाद्या आरोपीप्रमाणे कालच आणून सोडले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काल दिवसभरात कोणतीही प्रतिक्रिया आली …

Read More »

मोहन भागवत भिवंडीत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म म्हणजे काय…. तिरंगा या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र

मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, आपला …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा

राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …

Read More »

आरएसएसचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा गोप्यस्फोट, आरएसएसने सरदार पटेलांच्या त्या तीन अटी… संविधान निर्धार सभेतून वैदिक धर्मावर हल्ला !

एका बाजूला इथे वैदिक परंपरा आहे ती विषमतावादी आहे आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा आहे ती बंधू भावाची असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले. यावेळी, डॉ. बाबा आढाव, आमदार शिरिष चौधरी, आमदार कपिल …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान…. जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचा शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू असा निर्धार व्यक्त करत काँग्रेस हा बब्बर शेर आणि शेरनिंयोका पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी फुटली, पण काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. आम्ही …

Read More »