Tag Archives: sandipan bhumare

मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आंदोलनाला एक महिन्यासाठी स्थगिती सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची सरकारला एक महिना मुदत

मराठा आरक्षणप्रश्नी आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चवथ्या दिवसापासून ढासळायला सुरुवात झाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य …

Read More »

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. तत्पूर्वी चवथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असतानाच संभाजी नगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्ये आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये समोरासमोर येत परस्पर विरोधी घोषण देऊ लागले. मात्र उशीराने का होईना पोलिसांनी हस्तक्षेप करत …

Read More »

शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार संदिपान भुमरे

मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगरमधील संभावित उमेदवार कोण अशी चर्चा सातत्याने होत होती. अखेर शिवसेना शिंदे गटाकडून संभाजीनगर अर्थात पूर्वीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान फलोत्पादन आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे संदिपान भुमरे यांची थेट लढत शिवसेना उबाठा गटाचे खासदार चंद्रकांत खैरे आणि …

Read More »

मनोज जरांगे पाटील अडले सोयऱ्यावर तर गिरिष महाजन म्हणाले देता येणार नाही

मराठवाड्यासह राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याच्या प्रश्नी सध्या राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अल्टीमेटम आणि टीकणारं आरक्षणाच्या शब्दावरून खेळ सुरु आहे. राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची अंतिम तारीख दिली आहे. मात्र राज्य सरकारकडून आणखी वेळ मागण्यात येत आहे. मनोज जरांगे …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन …

Read More »

अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, आरक्षण मिळेल नाही तर अंत्ययात्रा निघेल… सरकारला दिली चार दिवसाची मुदत

जालना येथील आंतरवली सराटा गावात मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलनास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं दिसून आलं तर चार दिवसात मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन या असे शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री …

Read More »

रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६०हजारांचे अनुदान मिळणार रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की,खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता प्रशासनच जनतेच्या दारी जाणार 'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी …

Read More »

सरकार सर्वसामान्यांचे पण संकटसमयी सरकारमधील मंत्री कुठे झाले गायब? शिंदे समर्थक मंत्री ऐरवी टिव्ही दिसणारे संकटावर बोलायलाही दिसेना

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास ९ महिने पूर्ण होत आले आहेत. या नऊ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री जाहिर कार्यक्रमातून हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे सातत्याने जाहिरपणे सांगत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार असल्याचेही सातत्याने सांगत असतात. मात्र ऐरवी प्रतिस्पर्धी असलेल्या ठाकरे गटाच्या …

Read More »