Tag Archives: shivsena

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी योजना राबवा कल्याण डोंबिवली परिसराची भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नियोजन करा

मुंबई, ठाण्यानंतर आता कल्याण- डोंबिवली या शहरात वेगाने विकास होत आहे. हे लक्षात घेऊन येथील नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे शहराप्रमाणे सर्व योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले. तसेच भविष्यात कल्याण डोंबिवली परिसराला लागणारी पाण्याची गरज भागू शकेल याकरिता महानगरपालिका, जलसंपदा विभाग यासह …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल, राही सरनोबत आणि शहीद सूद वर सरकारकडून अन्याय का ? सुवर्ण पदक विजेती राही सरनोबतला वेतन द्या, शहीद सूद कुंटुबियांना मदत करा

सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …

Read More »

शिंदे गटाच्या राजेश शहाच्या मुलाचा प्रतापः बीएमडब्लू कारने महिलेचे प्राण घेऊन फरार पोलिसांकडून शोधाशोध सुरु केल्याची माहिती

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पैसेवाल्या आणि सत्तेची धुंदी चढलेल्या नेत्यांच्या पोरांच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या हिट अॅण्ड रन या घटनेची भर पडली आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या पोराने मुंबई वरळी येथील एका मच्छिमार महिलेला धडक तर दिली. पण नंतर सदर महिलेच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, राज्यात महागळती सरकार घोषणाच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढा मग कळेल किती अमलबजाणी किती झाली ते कळेल

राज्यातील महायुतीचे की डबल इंजिन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. राज्यातील प्रत्येक जण म्हणतोय या सरकारला बाय बाय करायची वेळ आली आहे. मात्र मी म्हणेन की राज्यातील हे महागळती-लिकेज सरकार आहे अशी खोचक टीका शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत या सरकारच्या काळात पेपर फुटी झाल्या …

Read More »

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला? हे सरकारने जाहीर करावे!

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »