Breaking News

Tag Archives: student

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता सानुग्रह अनुदान सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू

इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

या जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १५ टक्के कपात प्रा वर्षा गायकवाड यांचे शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

येत्या ९ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरु होत असतानाच २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपातीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी विभागस्तरावर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या …

Read More »

अखेर सीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहिर ! या अभ्यासक्रमांसाठी होणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी परिक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने या परिक्षा घेण्यासंबधीचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व …

Read More »

विद्यार्थ्यांना दिलासाः पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा यंदा नाही उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी राज्यातील विविध विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वी च्या परिक्षा घेता आले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. …

Read More »

ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खुषखबर शहरापासून १० किमी अंतरावरील विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ: सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या ११ वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »

महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करायचाय, मग ही यादी बघाच राज्य सरकारकडून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे कामगार, विद्यार्थी, पर्यटक किंवा यात्रेकरू म्हणून परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडला असाल तर घाबरू नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी राज्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली असून तुमच्या जिल्ह्यातील नेमक्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क साधता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील पुढील गोष्टींचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार माहिती द्या. …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला यश : कामगार, पर्यटक, विद्यार्थ्यांना गावी जाण्यास परवानगी मुंबईतील ६ लाखाहून अधिक कामगार घरी पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात अडकलेल्या जवळपास १० लाख कामगारांना त्यांच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून पर्यटक, विद्यार्थी यांनाही आपापल्या घरी जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून तसे आदेशही जारी करण्यात आले. विशेष म्हणजे परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती

अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …

Read More »

राजस्थानातील ते १८०० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई-चंद्रपूर : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राजस्थानमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने बोलणी सुरु केली असून हे विद्यार्थी लवकरच राज्यात परतणार असल्याची माहिती दिली. राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले १८०० विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग पूर्ण प्रयत्न …

Read More »

नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा …

Read More »