Tag Archives: vidhan parishad election

जयंत पाटील यांचा पराभव वगळता महायुती-महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने अकराव्या जागेसाठी जबरदस्त चुरस वाढली. अकराव्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की दोघांना आपापसात झुंज द्यावी लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर पुणे अपघातप्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी; बगलबच्च्यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न

राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …

Read More »

नाशिकमध्ये तांबे विजयाकडे तर अमरावतीत भाजपा पराभवाच्या छायेत, औरंगाबाद मविआकडे मविआकडे ३ तर भाजपा फक्त २ जागा परत मिळविण्यात यशस्वी

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी झालेल्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या नागपूर, अमरावती येथील जागा हिसकावून घेण्यात चांगल्यापैकी यश मिळविल्याचे दिसून येत आहे. तर नाशिकमध्ये भाजपाच्या पाठिब्यांवर लढत असलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडीच्या …

Read More »

निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदा जाहिर झालेल्या उमेदवाराची पहिली विजयी सलामी कोकण शिक्षक मतदार संघ शेकापकडून हिसकावून घेत भाजपा-शिंदे गटाने राखली

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी ३१ जानेवारी रोजी मतदान झाले. तसेच २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता कोकणमधील शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडी-शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील आणि ठाकरे गटाने उमेदवारी दिली नाही म्हणून बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत …

Read More »

विधान परिषदेसाठी नाशिक आणि अमरावतीत ४९ तर सर्वाधिक कोकणात मतदानाची टक्केवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघात राजकिय चुरस निर्माण झाल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाकडून चांगलीच रंगत आणली. विशेषतः नाशिक मतदारसंघातील तांबे पिता-पुत्राने …

Read More »

सुधीर मुंनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसे यांनी ४० वर्षे काम केले… विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांनी दावा फेटाळून लावला

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपातून आपल्याला आपल्या जून्या समर्थकांकडून मतदान केले जाईल असा दावा केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी भाजपाचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवर यांना भाजपाचे ६ आमदार खडसेंना मतदान करण्याच्या दाव्यावर प्रश्न …

Read More »

विधान परिषद निवडणूकः अखेर दोन तासानंतर मतमोजणीला सुरुवात नेमका कोणाचा उमेदवार बाजी मारणार

विधान परिषदेच्या रिक्त १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अतरले असून या निवडणूकीत भाजपाकडून ५ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी २ असे मिळून ६ उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपाच्या दोन उमेदवारांनी प्रक्रियेनुसार मतदान केले नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते अशोक चव्हाण …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पदरी निराशा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला

राज्यसभा निवडणूकीत मतदान करण्यास परवानगी मिळाली नाही किमान विधान परिषदेच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामिन मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मलिक आणि देशमुख यांना कोणत्याही स्वरूपाचा दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधी …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचा उमेदवार चमत्कारासाठी नाही तर… पाचही उमेदवार आमचेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत असा टोला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना लगावत शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात …

Read More »

विधान परिषद निवडणूकीत भाजपा-राष्ट्रवादीच्या दोघांनी अर्ज मागे घेवूनही चुरस कायम भाजपा पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जेंची माघार

राज्यसभा निवडणूकीनंतर विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीत समझौता होवू शकला नाही. त्यामुळे अखेर विधान परिषदेत १० जागांसाठी ११ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक होत असून भाजपाकडून ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार मागे घेतला. त्यामुळे आता विधान …

Read More »