नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत या मागे राज्य सरकारमधील एक विषारी मंत्री उघडपणे द्वेष पसरवित असल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे असा आरोप केला.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असे आवाहनही यावेळी केले.
प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज अधोरेखित करत सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महाराष्ट्र का एक विषैला मंत्री सरेआम समाज में नफरत फैलाने और बाटने का काम कर रहा हें। यही नही बल्की महाराष्ट्र में नफ़रत फैलाने के लिये बाहर से लोग लाये जा रहे हें।
ये एक बड़ी सोची-समझी साजिश का हिस्सा हैं!
नागपूर सहित सभी लोगो से अपील हें की अफ़वाओ पे ध्यान ना दे और शांती…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 18, 2025
Marathi e-Batmya